Thursday, July 23, 2020

अवीट गोडीचे गाणे -- माय नेम इज अँथनी गोन्साल्विस (अमर, अकबर, अँथनी)

 
 
 
अवीट गोडीचे गाणे -- माय नेम इज  अँथनी गोन्साल्विस (अमर, अकबर, अँथनी)

          हे गाणे अमर, अकबर, अँथनी या चित्रपटातील आहे. हा चित्रपट १९७७ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक मनमोहन देसाई आहेत. या चित्रपटाची कथा जीवनप्रभा देसाई यांनी लिहिली असून पटकथा प्रयाग राज यांनी लिहिली आहे. कादर खान यांनी संवाद लिहिले आहेत. या चित्रपटातील गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली असून लक्ष्मीकांत - प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केली आहेत. 
            माय नेम इज  अँथनी गोन्साल्विस या गाण्यात अमिताभ यांनी विनोदी अभिनय केला आहे. हे गाणे अमिताभ व परवीन बॉबी यांच्यावर चित्रित झाले आहे. ह्या गाण्याचे वैशिष्ठय म्हणजे अमिताभ यांनी किशोर कुमार समवेत गाणे गायलेले आहे. अमिताभ यांच्या विनोदी अदाकारीमुळे हे गाणे बघताना कंटाळा येत नाही. परत परत बघावेसे वाटते. 
 
We want a wonderful wow wait wait
you see the whole country of the system is just
opposition by the dev glowing
because you are sapasticared by ralaration
intaav siikeseshan by the tumesher are they
what

my name is Anthony Gonsalves
मैं दुनिया में अकेला हूँ
दिल भी है खाली घर भी है खाली
इसमें रहेगी कोई क़िस्मत वाली
हाय जिसे मेरी याद आए जब चाहे चली आए -२
रूपनगर प्रेमगली खोली न.म्बर चार सौ बीस
my name is...

you see such experiment
sasamstas for the extra bangle

अभी-अभी इसी जगह पे इक लड़की देखी है
अरे देखी है अजी देखी है
अभी-अभी इसी जगह पे ...
जो मुझे इशारे करती है पर किसी से शायद डरती है
अरे डरती है आहा डरती है उफ़
प्यार करेगी क्या डरने वाली
मेरी बनेगी कोई हिम्मत वाली
तो जिसे मेरी याद आए ...

you see the quiet piscent of the lending is inject
opposition by the glowing ermeshpiyarik
prisoner is the country today
बड़े-बड़े लोग यहाँ हैं लेकिन ये याद रहे
अरे याद रहे अजी याद रहे
बड़े-बड़े लोग यहाँ ...
सच्चा प्यार ग़रीबों का बाक़ी है खेल नसीबों का -२
दिल की ये बातें जग से निराली
ये क्या समझेगी कोई दौलत वाली
तो जिसे मेरी याद आए ...

no sebatian no
o goldy the anthony gonsalves yeah anthony
 



Friday, July 17, 2020

अमृत गाथा -- अभंग -- जन विजन झाले आम्हा । विठ्ठलनामाप्रमाणे ।।


अमृत गाथा -- अभंग -- जन विजन झाले आम्हा । विठ्ठलनामाप्रमाणे ।।

जन विजन झाले आम्हा । विठ्ठलनामाप्रमाणे ।। १ ।।
पाहें तिकडे बापमाय । विठ्ठल आहे रखुमाई ।। २ ।।
वन पट्टण एकभावं । अवघा ठाव सरता झाला ।। ३ ।।
आठव नाही सुखदुःखा । नाचे तुका कौतुके ।। ४ ।। 

ओवी :  जन विजन झाले आम्हा । विठ्ठलनामाप्रमाणे ।। १ ।। पाहें तिकडे बापमाय । विठ्ठल आहे रखुमाई ।। २ ।।
अर्थ : जन अगर जनरहित सर्व आम्हाला विठ्ठलनामाप्रमाणे झाले आहेत. जिकडे पाहतो तिकडे विठ्ठल बाप व रखुमाबाई आई भरलेली असे दिसते. 
भावार्थ : तुकाराम महाराजांनी आपल्या संसाराचा, सुखी जीवनाचा त्याग करून विठ्ठलभक्तीतच आपले जीवन अर्पण केले. ते दिवस रात्र विठ्ठलनामात, भजन-कीर्तनात तल्लीन होऊ लागले. यासाठी त्यांनी भौतिक सुखांचा पुर्णपणे त्याग केला. ते एवढे विठ्ठलात सामावले कि त्यांना संपूर्ण जगच विठ्ठलमय भासू लागले. जिकडे पाहावे तिकडे त्यांना विठ्ठल आणि रखुमाबाई आई भासू लागले. त्यांच्या डोळ्यासमोर विठ्ठल रखुमाई  उभे आहेत असे दिसू लागले. म्हणूनच ते म्हणतात कि, "जन अगर जनरहित सर्व आम्हाला विठ्ठलनामाप्रमाणे झाले आहेत. जिकडे पाहतो तिकडे विठ्ठल बाप व रखुमाबाई आई भरलेली असे दिसते."
ओवी : वन पट्टण एकभावं । अवघा ठाव सरता झाला ।। ३ ।। आठव नाही सुखदुःखा । नाचे तुका कौतुके ।। ४ ।।
अर्थ : वन असो अगर शहर असो आमचे मध्ये एकच भाव आहे. सर्व ठिकाणी योग्य असे पांडुरंगरूपच भासते. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही ह्या ऐक्यभावाच्या आनंदात कौतुकाने नाचतो. यामुळे आमचे चित्त सुखदुःखाच्या अनुभवाला विसरले आहेत. 
भावार्थ : तुकाराम महाराजांच्या अंतःकरणात पांडुरंग एवढा साठवला आहे कि ते जिथे जातील तिथे त्यांना पांडुरंगाचे दर्शन झालेशिवाय राहात नाही. त्यांना सगळीकडे पांडुरंग आपल्या जवळ उभा आहे असे भासत असते. ते वनात जरी गेले किंवा शहरात गेले किंवा घरी जरी असले तरी पांडुरंगाच्या भक्तीत, त्याच्या नामस्मरणात तल्लीन होऊन जातात. त्याच्या भजन-कीर्तनात रमतात. त्यांना सर्व ठिकाणी पांडुरंगाचे सावळे, सुंदर रूप भासत असते. त्यांना कुठल्याही जागेचे बंधन नाही. त्यांच्या मनात फक्त पांडुरंग हाच एक भाव आहे. 
               तुकाराम महाराज विठ्ठलनामात, त्याच्या भक्तीत एवढे तल्लीन होतात कि त्यांना संपूर्ण जगच विठ्ठलमय भासते. सगळीकडे त्याचे मोहक, अतिसुंदर रूप भासत असते. विठ्ठलही त्यांची भक्ती पाहून भारावून जातो. त्यांना आपल्या हृदयात स्थान देतो. दोघेही एकमेकांच्यात कधी एकरूप होतात ते दोघांनाही कळत नाही. ह्या ऐक्यभावनेमुळे तुकाराम महाराज एवढे आनंदित होतात कि त्यांना संपूर्ण  जगाचा विसर पडतो. ह्या ऐक्यभावनेमुळे त्यांचे  मन आनंदाने व कौतुकाने  नाचू लागते. त्यांचे मन विठ्ठलनामामुळे एवढे भारावलेले असते कि ते त्यांच्या देहाला विसरून जातात. भौतिक सुखदुःखाला विसरून जातात. विठ्ठलनाम हेच सुख मानू लागतात.


















 


मराठी कविता -- हट्टे कट्टे जवान आम्ही सैन्यात जातो ।



मराठी कविता -- हट्टे कट्टे जवान आम्ही सैन्यात जातो ।

हट्टे कट्टे जवान आम्ही सैन्यात जातो ।
दिसताच शत्रू आम्ही, बंदुकीच्या फैरी झाडतो ।। धृ ।।

ना आम्ही मागे सरत, ना आम्ही घाबरत 
दिसताच  शत्रू आम्ही त्यांच्यावर तुटून पडतो,
शत्रू असो कोणीही आम्ही प्राणपणाने लढतो 
हट्टे कट्टे जवान आम्ही सैन्यात जातो ।
दिसताच शत्रू आम्ही, बंदुकीच्या फैरी झाडतो ।। १ ।।

चीन असो कि पाकिस्तान, कि असोत दहशतवादी 
झाली कितीही आक्रमणे,
त्यांच्याशी आम्ही निर्भयपणे लढतो,
लागता गोळी आम्ही शहीद होतो 
हट्टे कट्टे जवान आम्ही सैन्यात जातो ।
दिसताच शत्रू आम्ही, बंदुकीच्या फैरी झाडतो ।। २ ।।

 ना आम्हाला जात ना धर्म,
ना आम्हाला प्रांत ना भाषा यांचे बंधन 
भारतमातेच्या छत्राखाली आम्ही राहतो,
तिरंग्याला आम्ही सलाम करतो 
हट्टे कट्टे जवान आम्ही सैन्यात जातो ।
दिसताच शत्रू आम्ही, बंदुकीच्या फैरी झाडतो ।। ३ ।।

लेखक -- संतोष जोशी 
              गंगापुरी, वाई, जिल्हा सातारा



 



















Thursday, July 16, 2020

मराठी कविता -- बाहुली



मराठी कविता -- बाहुली

          कवियत्रीने या कवितेत शो केस मधल्या बाहुलीचे वर्णन केले आहे. हि बाहुली दिसते कशी तर गोड, गोबरी, गोरी गोरी. तिचे डोळे टपोरे आहेत. बाहुलीने गुलाबी साडी घातली आहे व केसात वेणी माळली आहे. तिच्या गालावर हसू उमटले आहे. अशी हि शो केसमधील सुंदर बाहुली कवीयत्रीला खुणावत आहे. हि बाहुली  कवियत्रीच्या हाती लागली तेव्हा कवियत्रीला मनातून आनंद झाला. तिने बाहुलीला आपल्या हृदयाशी धरून तिच्या गालाचे चुंबन घेतले.       


गोड, गोबरी, गोरी - गोरी,

टपोरे डोळे, नखरे भारी,

खुणावत राही मज,

शो केस मधली एक बाहुली।।१।।



गुलाबी साडी, केसात वेणी,

गाली हसू लेऊनी आली,

हाती परी मज लागली,

शो केस मधली एक बाहुली।।२।।



उदास मी परी! हर्ष मनी,

हाती आली एकदा ती,

चुंबन तिज गाली, धरले हृदयी,

सुमानांपरी भासली,

शो केस मधली एक बाहुली।।३।।
कवियत्री -- सोनाली बेल्लूबी  
  

Wednesday, July 15, 2020

मराठी कविता -- प्रकाशातले तारे तुम्ही (इयत्ता ३ रीच्या मराठी बालभारती पाठ्यपुस्तकातील कविता)

 

मराठी कविता -- प्रकाशातले तारे तुम्ही (इयत्ता ३ रीच्या मराठी बालभारती पाठ्यपुस्तकातील कविता)

           "प्रकाशातले तारे तुम्ही" हि बालकविता उमाकांत काणेकर यांनी लिहिली आहे. हि कविता महंमद रफी यांनी गायली असून या कवितेला संगीत श्रीकांत ठाकरे यांनी दिले आहे. हि कविता इयत्ता तिसरीच्या मराठी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात दिली आहे. 
         लहान मुले म्‍हणजे देवाघरची फुले.लहान मुलांना या कवितेत  अंधारातुन प्रकाशाकडे जाण्‍यास कवि सांगत आहे. या कवितेत कवी मुलांना हसायला व आनंदी राहायला सांगत आहे. कवी मुलांना अंधारावर रुसा म्हणत आहे म्हणजेच मागच्या सर्व चिंता विसरून उद्या सूर्याबरोबर येणाऱ्या आनंदाच्या शिखरावरती जाऊन बसायला सांगत आहे. या कवितेत कवीने मुलांना प्रकाशातल्या ताऱ्यांची उपमा दिली आहे.
 
प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा
हसा मुलांनो हसा ।। धृ ।।


तुम्हा बोलवी ती फुलराणी
खेळ खेळती वारा-पाणी
आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाउन बसा ।। १ ।।

रडणे हा ना धर्म आपुला
हसण्यासाठी जन्म घेतला
भारतभूच्या आदर्शाचा मनी उमटु दे ठसा ।। २ ।।

सर्व मागचा विसरा गुंता
अरे उद्याच्या नकोत चिंता
बघा, अरुण तो बाळांनो रे, तुम्हा खुणावितो कसा ।। ३ ।।

Monday, July 13, 2020

तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- विठ्ठल हा चित्ती । गोड लागे गातां गीतीं ।।

तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- विठ्ठल हा चित्ती । गोड  लागे गातां गीतीं ।।

विठ्ठल हा चित्ती । गोड  लागे गातां गीतीं ।। १ ।।
आम्हां विठ्ठल जीवन । टाळ चिपळिया धन ।। २ ।।
विठ्ठल विठ्ठल वाणी । अमृत हे संजीवनी ।। ३ ।। 
रंगला या रंगे । तुका विठ्ठल सर्वांगे ।। ४ ।।

ओवी : विठ्ठल हा चित्ती । गोड  लागे गातां गीतीं ।। १ ।।
           आम्हां विठ्ठल जीवन । टाळ चिपळिया धन ।। २ ।।
अर्थ : श्रीविठ्ठलाचे नाव व गाणे चित्तास गोड लागते. आमचे जीवन एक विठ्ठलच असून टाळ चिपळ्या हेच काय ते आमचे धन आहे. 
भावार्थ : विठ्ठल भक्तीत एवढी जादू आहे कि माणूस स्वतःला हरवून जातो. विठ्ठलाचे नाव जरी घेतले तरी मनाला समाधान वाटते. मन प्रसन्न, आनंदी होते. विठ्ठल आपल्याबरोबर असून साऱ्या चिंता तो मिटवत आहे असे वाटते. म्हणूनच निश्तिन्त मनाने घेतलेले विठ्ठलाचे नाव व गाणे (विठ्ठलाचे गायलेले भजन-कीर्तन) मनास (चित्तास) गोड लागते. मन प्रफुल्लित होते. 
         एकदा विठ्ठलभक्तीत, नामस्मरणात मन रमले कि मनात विठ्ठलाशिवाय दुसरे कुठलेही विचार येत नाहीत. मनात विठ्ठलाचे नाव असले कि मनातील वाईट विचार, वाईट प्रवृत्ती दूर पळून जातात. आपल्या अंतःकरणात विठ्ठल आपले स्थान निर्माण करतो. तुकाराम महाराजही आपल्या साऱ्या चिंता, विवंचना विसरून विठ्ठलभक्तीत, नामस्मरणात एवढे रमले कि, ते पुर्णतः विठ्ठलमय झाले. त्यांच्या जीवनात विठ्ठलाशिवाय दुसऱ्या कुठल्याही गोष्टीला (सांसारिक गोष्टींना) स्थान नव्हते. हातात टाळ व चिपळ्या घ्यायच्या व  भंडारा डोंगरावर जाऊन एकांतात विठ्ठलनामात रंगून जायचे किंवा एखाद्या मंदिरात जाऊन भजन-कीर्तन करायचे व त्यात स्वतःला हरवून जायचे. हाच त्यांचा दिनक्रम असायचा. टाळ व चिपळ्या हेच त्यांचे साधन होते. म्हणूनच ते म्हणतात कि, "टाळ व चिपळ्या हेच आमचे धन आहे."
ओवी : विठ्ठल विठ्ठल वाणी । अमृत हे संजीवनी ।। ३ ।। 
           रंगला या रंगे । तुका विठ्ठल सर्वांगे ।। ४ ।।
अर्थ :  श्रीविठ्ठल हे शब्द केवळ संजीवनी अमृतच आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, या विठ्ठलरंगानेच मी सर्वांगाने रंगून गेलो. 
भावार्थ : तुकाराम महाराज जसजशे विठ्ठलभक्तीत रमू लागले तसे त्यांच्या  संसाराच्या साऱ्या चिंता मिटू लागल्या. संसारातील पाशातून मुक्ती मिळाली. त्यांच्यावर कोसळलेल्या आपत्तींमुळे ते दुःखी झाले होते. जीवनातील त्यांचा रसच संपून गेला होता परंतु विठ्ठलभक्तीमुळे, नामस्मरणामुळे त्यांच्यात नवचैतन्य निर्माण झाले. मोह, माया, मत्सर, क्रोध, अहंकार या गोष्टींपासून अलिप्त झाले. त्यांनी आपले जीवनच विठ्ठलाला अर्पण केले. ते पुर्णतः विठ्ठलमय झाले, विठ्ठलाशी  एकरूप झाले. 
विठ्ठलामुळे त्यांचे संपूर्ण जीवनच बदलून गेले. ते संतपदापर्यंत पोचले. विठ्ठलाचे भजन-कीर्तन करणे, नामस्मरण करणे, त्याची सतत भक्ती करणे हाच त्यांचा दररोजचा नित्यक्रम चालू झाला व यातूनच त्यांना आनंद मिळू लागला. जगातील इतर क्षणिक सुखांपेक्षा कितीतरी पटींनी विठ्ठलनामामुळे सुख प्राप्त झाले. म्हणूनच ते म्हणतात कि, "श्रीविठ्ठल ह्या एका शब्दापुढे सर्व सुखे फिकी पडतात." श्रीविठ्ठल या शब्दातच एवढे चैतन्य साठवले आहे कि हे नाव घेतले कि साऱ्या चिंता मिटून जातात, दुःखे नाहीशी होतात. संकटे कुठल्याकुठे पळून जातात. श्रीविठ्ठल म्हणजे पर्मोच आनंद आहे. जीवनामृत आहे. विठ्ठलनामातच मधुर रस आहे. हा रस कितीही प्याला तरी समाधान होत नाही. मन तृप्त होत नाही. तुकाराम महाराजांनी तर विठ्ठलनामाला संजीवनी अमृतच म्हणले आहे. यावरूनच विठ्ठलनामाची किती महती आहे हे दिसून येते. 



































 












 














 

Saturday, July 11, 2020

तुकाराम महाराज गाथा अभंग -- पंढरीचा महिमा ।



तुकाराम महाराज गाथा अभंग -- पंढरीचा महिमा ।

पंढरीचा महिमा । देतां आणिक उपमा ।। १ ।।
ऐसा ठाव नाहीं कोठें । देव उभाउभीं भेटे ।। २ ।।
आहेति सकळ । तीर्थे काळे देती फळ ।। ३ ।।
तुका म्हणे पेठ । भूमीवरी हे वैकुंठ ।। ४ ।।

ओवी : पंढरीचा महिमा । देतां आणिक उपमा ।। १ ।।
           ऐसा ठाव नाहीं कोठें । देव उभाउभीं भेटे ।। २ ।।
अर्थ : पंढरीच्या श्रेष्ठत्वाला दुसरी उपमाच देता येत नाही. कारण ह्यासारखे त्रैलोक्यात दुसरे ठिकाण नाही. येथे देव तत्क्षणीच भेटतो. 
भावार्थ : तुकाराम महाराज या ओवीतून पंढरीचा महिमा वर्णन करताना सांगतात कि, पंढरीमध्ये सर्व जनांचा देव तो विठ्ठल राहत असल्याने सर्व तीर्थाहूनही पंढरी श्रेष्ठ झालेली आहे. म्हणूनच दर आषाढी-कार्तिकी एकादशीला सर्व जाती धर्माचे, गरीब-श्रीमंत लाखोहून अधिक भाविक देवाला भेटण्यासाठी  पंढरीला जातात. ह्या तिन्ही लोकात (आकाश, जमीन व पाताळात) पंढरीसारखे दुसरे पवित्र ठिकाण नाही. येथे अंतःकरणापासून देवाची भक्ती केली कि देव लगेच दर्शन देतो. तो आपल्या भक्तांच्यात भेदभाव करत नाही. 
 ओवी : आहेति सकळ । तीर्थे काळे देती फळ ।। ३ ।।
            तुका म्हणे पेठ । भूमीवरी हे वैकुंठ ।। ४ ।।
अर्थ : बाकीची सर्व तीर्थे कालांतराने फळ देणारी आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, हि पंढरी पेठ पृथ्वीवर साक्षात वैकुंठच आहे. 
भावार्थ : पंढरीचा देव (विठ्ठल) सर्व इच्छा पूर्ण करणारा आहे. त्याच्यावर दृढ श्रद्धा असली कि तो भक्तांना संकटातून मुक्त करतो. त्याची मनापासून भक्ती केली, त्याचे नामस्मरण घेतले कि लगेच दर्शन देतो. म्हणूनच गोरगरीब जनता विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीची वाट धरतात कारण त्यांना माहित असते कि देवापुढे आपले गाऱ्हाणे गायले कि देव लगेच आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणार म्हणूनच भाविक इतर तीर्थक्षेत्रांना न जाता पंढरपूरला जातात. 
          तिथे भाविकांचा मेळा भरलेला असतो. सर्व भक्त मंडळी विठ्ठलनामात दंग असतात व भजन कीर्तनात रंगून गेलेले असतात. तिथे विठ्ठलनामाचा गजर चालू असतो. प्रत्येकजण पांडुरंगाच्या दर्शनासाठी आसुसलेला असतो. तिथले वातावरण भक्तिमय व पवित्र व निर्मळ झालेले असते. पांडुरंगाची सुशोभित केलेली मूर्ती व पंढरीचा सोहळा बघून तिथे जणू काही स्वर्गच अवतरला आहे असे वाटते. म्हणूनच तिथला सोहळा बघून तुकाराम महाराज म्हणतात, हि पंढरी म्हणजे पृथ्वीतलावर उतरलेला स्वर्ग (वैकुंठ) आहे.




























     

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...