तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥
तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥
अवीट गोडीचे गाणे - रामजी की निकली सवारी
'रामजी की निकली सवारी' हे अवीट गोडीचे गाणे सरगम या चित्रपटातील आहे. हे गीत आनंद बक्षी यांनी लिहिले असून मोहमद रफी यांनी आपल्या सुरेल आवाजात गायले आहे. हे गीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केले. हे गीत ऋषी कपूर यांचेवर चित्रित केलेले आहे.
आनंद बक्षी यांनी पहिल्या कडव्यात रामाचे किती सुंदर वर्णन केले आहे. डोक्यावर मुकुट सजवलेला आहे. चेहरा प्रसन्न असून त्यावर आनंद आहे. हातात धनुष्य असून गळ्यात पुष्पमाला आहे. असा हा सगळ्यांचा स्वामी असून आपण त्याचे दास म्हणजेच सेवक आहोत. असा हा विष्णूचा अवतार राम असून त्याच्यापुढे नतमस्तक होऊ या.
राम रावणाचा वध करून अयोध्येत परत आला आहे व त्याची मिरवणूक निघालेली आहे. सर्व स्त्री-पुरुषांना रामाच्या दर्शनाची आस लागलेली आहे. त्याचे दर्शन व्हावे यासाठी सर्व अयोध्यावासी व्याकुळ झालेले आहेत. त्याचे एकदा दर्शन घेतले तरी मन भरणार नाही. परत परत (शंभरवेळा) दर्शन घेतले तरच मन भरणार आहे. म्हणूनच रथ हाकणाऱ्याला सांगितले कि तुझा रथ हळू हळू चालव म्हणजे सर्व अयोध्यावासीयांना रामाचे मन भरून दर्शन घेता येईल.
तिसऱ्या कडव्यात आनंद बक्षी यांनी थोडक्यात रामाची गोष्ट सांगितली आहे. रामाने चौदा वर्ष वनवास भोगून आपल्या आई-वडिलांचे वचन पाळले. रावणाने रामाला फसवून सीतेचे अपहरण केले. रामाने हनुमान व वानरांच्या मदतीने रावणाचा वध करून सीताला सोडवले व लंका जिंकली. राम विजयी होऊन अयोध्येत परत आला आहे व त्याची मिरवणूक निघालेली आहे.
चौथ्या कडव्यात आनंद बक्षी यांनी रथात आरूढ झालेल्या रामचे वर्णन असे केले आहे, 'एका बाजूला लक्षुमण उभा आहे तर दुसऱ्या बाजूला सीता उभी आहे. मध्ये जगाचा पालनकर्ता असा राम उभा आहे. या तिघांची मिरवणूक अयोध्येतून निघालेली आहे.'
या गीतात आनंद बक्षी यांनी विजयी होऊन अयोध्येत परतलेल्या रामाचे सुंदर वर्णन केले आहे. मोहमद रफी यांनीही आपल्या सुरेल आवाजात हे गीत गायले आहे. म्हणूनच हे गीत परत परत ऐकावेसे वाटते.
सर पे मुकुट सजे मुख पे उजाला
मुख पे उजाला
हाथ धनुष गले में पुष्प माला
हम दास इनके यह सबके स्वामी
अंजान हम यह अंतरयामी
शीश झूकाओ राम गुण गाओ
बोलो जय विष्णु के अवतारी
रामजी की निकली सवारी,॥
रामजी की लीला है न्यारी ,
धीरे चला रथ ओ रथ वाले,
तोहे खबर क्या ओ भोले भाले,
एक बार देखे दिल ना भरेगा,
सौ बार देखो फिर जी करेगा ,
व्याकुल बड़े हैं काब्से खड़े हैं ,
दर्शन के प्यासे सब नर और नारी,
रामजी की निकली सवारी,
रामजी की लीला हैं न्यारी न्यारी ,
चौदह बरस का वनवास पाया,
माता पिता का वचन निभाया ,
धोखे से हर ली रावण ने सीता,
रावण को मारा लंका को जीता ,
तब तब यह आए तब तब यह आए ,
जब जब ये दुनिया इनको बुलाये,
रामजी की निकली सवारी,
रामजी की लीला है न्यारी
रामजी की निकली सवारी,
रामजी की लीला है प्यारी
एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता
बीच में जगत के पालनहारी
रामजी की निकली सवारी,
रामजी की लीला हैं न्यारी,
रामजी की निकली सवारी,
रामजी की लीला है न्यारी
तुकाराम महाराज गाथा - अभंग - डोई वाढवूनि केश । भूतें आणिती अंगास ॥
डोई वाढवूनि केश । भूतें आणिती अंगास ॥१॥ तरी ते नव्हति संतजन । तेथें नाहीं आत्मखुण ॥२।।
मेळवूनि नरनारी । शकुन सांगे नानापरी ॥३॥ तुका म्हणे मैंद । नाहीं त्यापासीं गोविंद ॥४॥
ओवी : डोई वाढवूनि केश । भूतें आणिती अंगास ॥१॥ तरी ते नव्हति संतजन । तेथें नाहीं आत्मखुण ॥२।।
अर्थ : डोक्यावर केस वाढवून कित्येक ढोंगी आपल्या अंगामध्ये भुतें आणतात. पण तेवढ्याने ते संत होत नाहीत. कारण आत्मानुभवाची खूण तेथे नसते.
भावार्थ : बरेच लोक असे असतात कि, ते आपल्या डोक्यावर केसांच्या जटा वाढवतात. अंगावर भस्म लावतात, गळ्यात मोठमोठया माळा घालतात व स्वतःला संत म्हणवतात. खरे तर हे लोक ढोंगी, पाखंडी असतात. त्यांना देवाविषयी, भक्तीविषयी काही ज्ञान नसते. परंतु खोटे ज्ञान सांगून लोकांना फसवण्याचा धंदा करतात. ह्या लोकांच्यात स्वार्थभाव दडलेला असतो. यांचे मन कधीही शुद्ध नसते. मन विषयांनी भरलेले असते. वरवर हे लोक संतांचा आव आणत असले तरी यांचे मन संसारचक्रात, मोहमायेत अडकलेले असते. त्यामुळे यांची भक्ती देवापर्यंत पोचू शकत नाही. त्यांच्या भक्तीत तेवढी ताकत नसते. त्यांच्यात आत्मानुभवाची खूण नसते म्हणजेच देवाने यांना दर्शन दिले आहे किंवा संकटकाळी देवाने यांना मदत केली आहे तसेच या लोकांनी देवाच्या मदतीने संकटात सापडलेल्या लोकांना सोडवले आहे असा काही त्यांना अनुभव आला नाही कारण त्यांच्या आत्म्याची ओळख देवाला कळली नाही.
खरे संत आहेत त्यांना केसांच्या जटा वाढवून, अंगाला भस्म फासून, अंगात भूते आणून संत म्हणवून घेण्याची गरज नसते. हे संत ईश्वरकार्यानेच संतपदाला पोहोचतात. त्यांचा जन्मच ईश्वरकार्यासाठी झालेला असतो. ईश्वरच त्यांचे हातून सत्कर्म घडवून आणत असतो. हि संतमंडळीसुद्धा ईश्वराने सांगितलेले कार्य करत असतात. ईश्वरभक्ती करा, त्याचे नामःस्मरण घ्या, शुद्ध आचरण ठेवा, नितीचा मार्ग अवलंबा, सत्याच्या मार्गावरून चाला ह्या ईश्वराने सांगितलेल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम हि संतमंडळी करत असतात. संतमंडळींनी संसार, घरदार, संपत्ती यांचा त्याग करून, मोहमयी जीवनापासून लांब जाऊन ईश्वरभक्तीत तल्लीन झालेले असतात. ईश्वरचिंतनात हरवून गेलेले असतात. अशावेळेस त्यांचा संपूर्ण देह ईश्वराशी एकरूप झालेला असतो. त्यांचे मन ईश्वराचे अधीन झालेले असते. त्यांना थोडावेळ का होईना ईश्वररूप प्राप्त होते. हा जो संतांना अनुभव येतो तो आत्मानुभव. हा आत्मानुभव ढोंगी संतांना येत नाही. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, "डोक्यावर केस वाढवून कित्येक ढोंगी आपल्या अंगामध्ये भुतें आणतात. पण तेवढ्याने ते संत होत नाहीत. कारण आत्मानुभवाची खूण तेथे नसते."
ओवी : मेळवूनि नरनारी । शकुन सांगे नानापरी ॥३॥ तुका म्हणे मैंद । नाहीं त्यापासीं गोविंद ॥४॥
अर्थ : काही मूर्ख, पुरुष व बायका यांना जमवून कित्येक नाना प्रकारचे शकुन सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात, असल्या मैंदाजवळ खरोखर गोविंद रहात नाही.
भावार्थ : काही लबाड ढोंगी लोक 'मला देवाची कृपा झाली आहे, त्याच्या आज्ञेनेच मी तुमचे भविष्य (शकुन) सांगतो.' असे पुरुष व बायका यांना जमवून सांगत असतात. पुरुष व बायकाही अंधपणाने या ढोंगी, मूर्ख लोकांवर विश्वास ठेवतात. खरं तर हे लोक खोटेपणाने पुरुष व बायकांना आपल्या जाळ्यात ओढून फसवत असतात. मासेमारी करणारा पाण्यात गळ टाकून बसतो व खाण्याच्या आशेने मासे त्या गळाला फसतात. तसेच हे ढोंगी लोक खोटी भविष्यवाणी सांगण्याचा गळ टाकतात व स्त्री-पुरुष बरोबर याच्या गळाला फसतात. असे ढोंगी लबाड लोक आपले पोट भरण्यासाठी लोकांना फसवत असतात. त्यांचे मनात स्वार्थभाव दडलेला असतो. मनात लालसा उत्पन्न झालेली असते. या लालसेपोटीच त्यांनी शकुन (भविष्यवाणी) सांगण्याचा खोटा धंदा उघडलेला असतो. या ढोंगी लोकांचे मन कधीही शुद्ध नसते. देवाला आवडतो निस्वार्थ व शुद्ध भाव. तोच या ढोंगी-लबाड लोकांकडे नसतो म्हणूनच गोविंद (विठ्ठल) यांचेजवळ रहात नाही.
हाकेसरिसी उडी । घालूनियां स्तंभ फोडी ॥१॥
ऐसी कृपावंत कोण । माझे विठाईवांचून ॥ध्रु.॥
करितां आठव । धांवोनियां घाली कव ॥२॥
तुका म्हणे गीती गातां । नामें द्यावी सायुज्यता ॥३॥
ओवी : हाकेसरिसी उडी । घालूनियां स्तंभ फोडी ॥१॥ ऐसी कृपावंत कोण । माझे विठाईवांचून ॥ध्रु.॥
अर्थ : प्रल्हादाने नारायण नामाने हाक मारल्याबरोबर देव त्याजकरिता धाव घेवून खांब फोडून प्रगट झाले. अशी कृपावंत माझ्या विठाई माऊलीवाचून कोण आहे ?
भावार्थ : प्रल्हाद हा राजा हिरण्यकश्यपू याचा मुलगा होता. प्रल्हादाची भगवान विष्णूवर अतोनात भक्ती होती. तो सतत विष्णूच्या नामःस्मरणात तल्लीन असायचा त्याचे मुखातून 'नारायण-नारायण' हे शब्द बाहेर पडायचे. त्याची हि भक्ती हिरण्यकश्यपूला आवडायची नाही. प्रल्हादाची भक्ती तुटण्यासाठी हिरण्यकश्यपू त्याचा हर प्रकारे छळ करायचा. कधी त्याला चाबकाचे फटके द्यायचा, त्याच्यावर गरम तेल ओतायचा. अशी त्याला शिक्षा द्यायचा. हि शिक्षा होऊनही प्रल्हादाची भक्ती तसूभरही कमी झाली नाही उलट वाढतच चालली. प्रल्हादाची वाढत चाललेली भक्ती बघून हिरण्यकश्यपूला आणखी राग यायला लागला. त्याने प्रल्हादाला विचारले, "तु एवढा नारायण-नारायण करतोस तर कुठे आहे तुझा नारायण?" प्रल्हाद म्हणाला, "नारायण चराचरात आहे, कणाकणात आहे, आकाशी आहे पाताळी आहे, सजीवात आहे निर्जीवात आहे, त्याने सर्व विश्व व्यापले आहे. तो सर्वेश्व, विश्वात्मा आहे." हे ऐकून हिरण्यकश्यपूच्या अंगाचा तीळपापड झाला. त्याने एका खांबाकडे बोट दाखवून प्रल्हादाला विचारले कि, "ह्या खांबात तुझा नारायण असेल तर दाखव मला." असे म्हणून हिरण्यकश्यपूने खांबाला लाथ मारली. प्रल्हादाने नारायणाचा धावा करायला सुरवात केली. त्याची हाक ऐकून नारायण नरसिंहाच्या रूपात खांब तोडून प्रकट झाले व त्यांनी हिरण्यकश्यपूचा वध केला.
नारायणाने जसे नरसिहांचे रूप घेऊन प्रल्हादाला संकटातून सोडवले तसेच नारायण तसेच नारायण विठ्ठलाचे रूप घेऊन सर्व संतांचा उद्धार करण्यासाठी पृथ्वीतलावर अवतरला. त्याने सर्व संतांना संकटातून मुक्त केले. त्यांच्यावरील सर्व दुःखे स्वतः झेलली व त्यांना सुख प्राप्त करून दिले. अशी हि कृपावंत विठाई माउली म्हणजेच प्रल्हादाला संकटातून सोडवणारे नारायणाचे रूप आहे.
ओवी : करितां आठव । धांवोनियां घाली कव ॥२॥ तुका म्हणे गीती गातां । नामें द्यावी सायुज्यता ॥३॥
अर्थ : तिचा आठव केल्याबरोबर मोठ्या प्रेमाने धाव घेवून ती आठव करणारास मिठी घालते. तुकाराम महाराज म्हणतात, हरीचे नाम गाण्याने सायुज्यता मिळते.
भावार्थ : विठाई माऊली हि आपल्या भक्तांबाबत प्रेमळ आहे, कृपावंत आहे. आपल्या भक्ताने अंतःकरणापासून केलेली भक्ती विठाई माऊलीला आवडते. आई जसे आपल्या मुलावर माया करते, प्रेम करते तसेच विठ्ठल आपल्या भक्तांची आई बनून, माऊली बनून भक्तांना लेकरासमान मानून त्यांच्यावर प्रेम करते, माया लावते. विठ्ठलाचे व भक्ताचे नाते वात्सल्याचे आहे. भक्तसुद्धा विठ्ठलाला आपल्या माऊलीसमान मानतो. मुलगा कसा 'आई-आई' म्हणून आठवण काढतो व आईसुद्धा आपल्या मुलाकडे धाव घेते व मुलाला प्रेमाने मिठीत घेते तसेच विठाई माऊलीचा आठव केल्याबरोबर म्हणजेच विठ्ठलाचे नामःस्मरण केल्याबरोबर विठ्ठल धावत येतो व आपल्या भक्ताला प्रेमाने मिठी मारतो.
तुकाराम महाराज म्हणतात, हरीचे नाम गाण्याने सायुज्यता मिळते. विठ्ठलाचे नाम हे गोड असून पवित्र, निर्मळ आहे. या नामात दडली आहे प्रसन्नता, सात्विकता. म्हणूनच जो हरीचे(विठ्ठलाचे) नाव घेईल त्याला जीवनात सुख, शांती प्राप्त होईल. जगातील परमोच्च आनंद प्राप्त होईल. मनुष्याने जर नित्यनियमाने हरीचे(विठ्ठलाचे) नामःस्मरण केले तर त्याला देवाजवळ जाता येते. विठ्ठलालाही आपले नामःस्मरण केलेले आवडते. जो कोणी भक्त नित्यनियमाने विठ्ठलाचे गुणगान गात असेल, त्याचे नामःस्मरण घेत असेल त्याच्यावर विठ्ठल प्रसन्न होतो व त्याला संसारचक्रातून सोडवतो. जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करतो व मोक्षपदाला नेतो. विठ्ठल त्याला सायुज्यता मिळवून देतो.
अवीट गोडीचे गाणे - मैने कहा फूलों से, हँसो तो वो खिल खिला के हंस दिए (चित्रपट - मिली)
"मैने कहा फूलों से हँसो तो वो खिल खिला के हंस दिए" हे अवीट गोडीचे गाणे मिली या चित्रपटातील आहे. हा चित्रपट १९७५ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माता एन सी सिप्पी व हृषीकेश मुखर्जी असून दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी आहेत. या चित्रपटातील गाणी योगेश यांनी लिहिली असून एस. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केली आहेत. या चित्रपटातील गाणी किशोर कुमार यांनी गायली असून मैने कहा फूलों से हँसो तो वो खिल खिला के हंस दिए हे एकमेव गीत लता मंगेशकर यांनी गायले आहे. या चित्रपटात जया भादुरी, अमिताभ बच्चन, अशोक कुमार, अरुणा इराणी यांच्या मुख्य भूमिका आहेत.
"मैने कहा फूलों से हँसो तो वो खिल खिला के हंस दिए" हे अवीट गोडीचे गाणे जया भादुरी यांच्यावर चित्रित झाले असून लता मंगेशकर यांनी आपल्या सुरेल आवाजात हे गीत गायले आहे. हे गीत कानाला फारच मोहक वाटते व परत परत ऐकावेसे वाटते.
मैने कहा फूलों से
हँसो तो वो खिल खिला के हंस दिए
और ये कहा जीवन है
भाई मेरे भाई हँसने के लिए
हो मैने कहा फूलों से
हँसो तो वो खिल खिला के हंस दिए
और ये कहा जीवन है
भाई मेरे भाई हँसने के लिए
हँसने के लिए
(मैने कहा फूलों से)
(हँसो तो वो खिल खिला कर हंस दिए)
सूरज हसा तो बिखर बिखर गयी किरणें
सूरज हसा तो बिखर बिखर गयी किरणें
सूरज हंसा रे
किरण किरण चुन कर धरती ये
सज के सुनेहरी बन गयी रे
मैने कहा
ओ मैने कहा सपमों से
सजो तो वो मुस्कुरा के सज गये
और ये कहा जीवन है
भाई मेरे भाई सजने के लिए
सजने के लिए
(मैने कहा फूलों से)
(हँसो तो वो खिल खिला कर हंस दिए)
ये शाम तो यूँ हँसी जैसे हँसी दुल्हन
तुकाराम महाराज गाथा - अभंग - नका घालू दुध जयामध्ये सारं ।
नका घालू दुध जयामध्ये सार । ताकाचे उपकार तरी करा ॥१॥
नेदा तरी हे हो नका देऊ अन्न । फुकाचे जीवन तरी पाजा ॥२॥
तुका म्हणे मज सगुणाची चाड । पुरवा कोणी कोड दुर्बळाचे ॥३॥
ओवी : नका घालू दुध जयामध्ये सार । ताकाचे उपकार तरी करा ॥१॥
नेदा तरी हे हो नका देऊ अन्न । फुकाचे जीवन तरी पाजा ॥२॥
अर्थ : अहो, तुम्ही कोणाला दुध देवू नका कारण ते सारभूत असून मोठ्या किंमतीचे आहे, परंतु असारभूत जे ताक त्याचा तरी उपकार करा (ते लोकांना द्या). तुम्ही अन्न कोणाला देत नाही तर नका देवू, पण फुकटचे पाणी तरी पाजा.
भावार्थ : काही लोक दानधर्म करण्याबाबत आपला हात आकडता घेतात. आपल्याकडे आहे त्यातील थोडे का होईना गरजुंना, गरिबांना, दीन-दुबळ्यांना द्यावे असे त्यांना अजिबात वाटत नाही. या लोकांना जर दिले तर आपल्याकडे आहे ते संपेल असे या लोकांना वाटते. पण देणारा (देव) तर वर बसला आहे. तो सढळ हाताने देत असतो. काही कमी पडू देत नाही. म्हणून आपण शक्यतो तितकी मदत गरजूना, अडलेल्याना करावी. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि, "तुम्ही कोणाला दुध देवू नका कारण ते सारभूत असून मोठ्या किंमतीचे आहे, परंतु असारभूत जे ताक त्याचा तरी उपकार करा (ते लोकांना द्या)." तसेच तुकाराम महाराज म्हणतात, "तुम्ही अन्न कोणाला देत नाही तर नका देवू, पण फुकटचे पाणी तरी पाजा" म्हणजेच काही लोकांना द्यायची दानत नसते तसेच दुसऱ्यांना देण्याबाबत त्यांचा हात आकडता असतो अशा लोकांना उद्देशून तुकाराम महाराज म्हणतात. खरे तर पाणी हे जीवन आहे. एकवेळ अन्नावाचून माणूस जगू शकेल परंतु पाणी मिळाले नाही तर माणूस तडफडून मरेल. माणूस पाण्याच्या शोधात लांब लांब भटकत असतो. जिथे पाण्याचा ठिपूस नसतो तिथल्या लोकांचे हाल होतात. एखाद्याला तहान लागली आणि त्याला पाणी मिळाले नाही तर त्याचा जीव कासावीस होतो. म्हणूनच पाणी हे जीवन आहे व आपण दुसऱ्याला पाणी पाजतो म्हणजेच त्याला आपण जीवनच देत असतो. खरे तर आपल्या हातून सत्कर्म घडत असते. पुण्य प्राप्त होत असते. तहानलेल्या माणसाला पाण्याचा एक थेंब जरी मिळाला तरी त्याचा आत्मा शांत होतो. तो आपल्याला चांगला आशिर्वाद देतो. चांगला आशिर्वाद मिळणे हीच खरी फलप्राती होय.
ओवी : तुका म्हणे मज सगुणाची चाड । पुरवा कोणी कोड दुर्बळाचे ॥३॥
अर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, 'मला हरीच्या सगुणरूपाची इच्छा आहे. एवढ्याकरिता मज दुर्बळाची ती इच्छा कोणी तरी पूर्ण करा.'
भावार्थ : तुकाराम महाराजांना हरीचे सगुणरूप बघण्याची इच्छा आहे. त्यासाठी त्यांचा जीव तळमळत आहे. तुकाराम महाराजांनी हरीची एवढी भक्ती केली कि त्यांना हरीच्या सगुणरूपाच्या दर्शनाची आस(ओढ) लागली आहे. कधी एकदा हरीचे सावळे, सुंदर, मनोहारी रूप डोळ्यात साठवतो असे त्यांना झाले आहे. म्हणूनच ते संत-सज्जन लोकांना विनवणी(विनंती) करितात कि, 'मला हरीच्या सगुणरूपाची इच्छा आहे. एवढ्याकरिता मज दुर्बळाची ती इच्छा कोणी तरी पूर्ण करा.'
तुकाराम महाराज गाथा - अभंग - धीर तो कारण । साह्य होतो नारायण ।।
तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...