Monday, October 1, 2018

पुस्तक हे आपले मित्र


<a href="http://marathibloglist.blogspot.in/" target="_blank"><img title="मराठी ब्लॉग लिस्ट- मराठी ब्लॉग्सची डिरेक्टरी" src="http://s12.postimg.org/4aucbuf6x/MBL_Logo.jpg" /></a>

पुस्तक हे आपले मित्र 

          प्रत्येकाला मित्र हा असतोच, जो आपल्याशी बोलतो, आपल्या सोबत खेळतो, भांडतो वगैरे. पण अशीही मित्र असतात जी न बोलता आपल्याशी संवाद साधतात. व आपल्या मनातील गोष्ट पारखून घेतात ते म्हणजे पुस्तके. पुस्तकाशी खूप माणसांचे अतूट नाते आहे. अशीही काही माणसे आहेत कि जी पुस्तकांशिवाय राहू शकत नाहीत. पुस्तकांमुळे आपले मन प्रसन्न होते व आपल्याला सगळीकडे हर्षता वाटू लागते. 
          पुस्तक आपली इच्छा पूर्ण करते. पुस्तक आपल्याला खूप काही अश्या गोष्टी सांगते कि ते जीवनभर आपल्याला उपयोगी पडेल. पुस्तकांमुळे आपल्या मनात नवीनच भावना निर्माण होतात. आपले शरीर व मन चैतन्याने फुलून उठते. आपल्या मनात नवीन कल्पना सुचतात. आपली कल्पनाशक्ती व एकाग्रता वाढते. पुस्तकाने आपले ज्ञान वाढते व खूप काही शिकायला मिळते. आयुष्यात कुठलीही कठीण परिस्थिती असुदे पुस्तक आपल्याला कधीच एकटं सोडणार नाही. उलट आपली भिंत बनून आपली साथ देईल. पुस्तकामुळे आपल्याला आपली योग्यता व गुण कळतात. 
          पुस्तक आपल्याला स्वतःमध्ये रामवते. जी गोष्ट किंवा बातमी टीव्हीवर बघतो किंवा रेडिओवर ऐकतो पण तीच गोष्ट आपण पुस्तकात ध्यानपूर्वक वाचली तर आयुष्यभर आपल्या लक्षात राहील याची खात्री आहे. आपल्या डोक्यावर कामाचा ताण साठून राहिलेला असतो तो पुस्तकामुळे दूर होऊ शकतो. पुस्तक जरी निर्जीव असले तरी ते सजीवाचे काम करते पुस्तक आपले चांगले साथी बनून शेवटपर्यंत आपली साथ देत असते. आपल्या अंगात धीर, धैर्य व अनेक इतर गोष्टी जागृत होतात. आपल्या जीवनाची रीत बदलून जाते. 
          पुस्तक आपल्याला शिस्तीचं कसं पालन करावं व आपल्याला चांगल्या सवयी कश्या लावाव्यात हे सांगते. आपल्या अंगात झालेल्या सुजाणतेमुळे आपल्या जीवनातील अधोगती नष्ट होते व आपल्याला प्रगतीचा मार्ग दिसू लागतो. आपण स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो यामुळे आपल्यात आत्मविश्वास वाढतो. 
          पुस्तके अनेक प्रकारची आहेत जशी गंभीर, हास्यमय, कलाकृतीची, आनंदी इत्यादी. पुस्तकातील एकूण एक पात्र खरे आहे असे वाटते व त्या पुस्तकातील व्यक्तीसारखे वागावेसे वाटते. आपण पुस्तकातील एक-एक शब्दाचा किंवा ओळीचा विचार करू लागतो. आपण वाचत असताना पूर्णपणे मग्न होऊन जातो. पुस्तकामुळे संवाद वाढतात. 
          पुस्तक आणि आपले नाते पक्के होण्यासाठी नेहमी वाचन करावं लागतं. पुस्तकाची किंमत सोन्याहून अधिक आहे. पुस्तक हि एक मौल्यवान वस्तू आहे कारण पुस्तकामुळे आपल्याला ज्ञान प्राप्त होते. सोनं आपल्या अंगावर शोभतं, आपल्या अंगाची शोभा वाढवतं पण मनात सोन्याची चोरी होईल याची भीती असते. पण पुस्तकांचे तसे नसते. पुस्तकामुळे आपल्या अंगातील गुण दिसू लागतात, आपले विचार सगळ्यांना पटू लागतात व आपल्या गुणांची व विचारांची चोरी होऊ शकत नाही. पुस्तकात लपलेले विचार खूप सुंदर असतात. पुस्तकाची पैशाने किंमत कमी जास्त जरी असली तरी ते विचारशक्तीने मोठेच आहे. 



































6 comments:

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...