Sunday, April 28, 2019

लेख -- महाराष्ट्र कोणाचा ?




 लेख -- महाराष्ट्र  कोणाचा ?

          'महाराष्ट्र  कोणाचा ?' ह्याचे उत्तर म्हणजे ज्यांनी महाराष्ट्रासाठी आपले आयुष्य वेचले त्यांचा महाराष्ट्र. मराठी भाषेवर व मातीवर प्रेम करणाऱ्या माणसांचा. ज्यांच्या नासा-नसात व रक्तात महाराष्ट्र भिनला आहे त्यांचा. 
                     महाराष्ट्र हि संतांची भूमी. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, गोरा कुंभार, चोखा मेळा, संत जनाबाई अशी संत मंडळी महाराष्ट्राला लाभली. यांच्या भजन, कीर्तन व ओव्यांनी महाराष्ट्राला शिकवण दिली. त्यांची पांडुरंगावर अपार श्रद्धा आहे. त्यामुळेच लाखोंहून अधिक वारकरी नित्यनेमाने दर आषाढी, कार्तिकेला आळंदी, देहूपासून पंढरपुरापर्यंत पायी वारी करतात. संत तुकडोजी महाराज यांनी भारुडाच्या माध्यमातून लोकजागृती केली. गाडगेबाबा यांनी हातात झाडू घेऊन समाजसेवा केली. 'जय जय रघुवीर समर्थ' अशी आर्त हाक देत शिवाजी महाराजांना व महाराष्ट्राला शिकवण दिली ते म्हणजे समर्थ रामदास स्वामी. त्यांचे 'मनाचे श्लोक' आजही  म्हणले जातात. सज्जनगडावर त्यांचे देहावसान  झाले. 
          आज महाराष्ट्रातून ज्यांचे नाव आदराने घेतले जाते व संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे पोवाडे गायले जातात ते म्हणजे शिवाजी महाराज. अख्खा महाराष्ट्र मुसलमानांच्या तावडीत  होरपळत असताना शिवाजी महाराजांनी समोरासमोर आणि गनिमी काव्याने मोगलांशी लढून आपले स्वराज्य स्थापन केले. ज्यांनी अटकेपार झेंडे नेले व इंग्रजांशी दोन हात केले ते पुण्यातील राघोबादादा  पेशवे तसेच न्यायाबाबत एकनिष्ठ असणारे रामशास्त्री  प्रभुणे पुण्यातील होय. 
          आपल्या महाराष्ट्राला थोर संतांबरोबरच थोर समाजसुधारकांची  देणगी लाभली आहे. बाळशास्त्री जांभेकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महर्षी  धोंडो केशव कर्वे, सेनापती बापट, शाहूमहाराज, आचार्य विनोबा भावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आणि इतर बऱ्याच समाजसुधारकांनी दलितांसाठी, महिलांसाठी, महाराष्ट्रातील अनिष्ठ प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी धडपड केली. इंग्रजांविरुद्ध लढताना तुरुंगवासही भोगावा लागला. आदय क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, राजगुरू, सुखदेव हे फासावर लटकून शाहिद झाले. 
          आपल्या महाराष्ट्रात थोर साहित्यिक व विचारवंत जन्माला आले. पु. ल. देशपांडे, प्र. के. अत्रे, राम गणेश गडकरी, ना. सी. फडके, वि. वा. शिरवाडकर, शिवाजी सावंत, ना. धो. महानोर, ग. दि. माडगूळकर यांच्या लेखणीने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावले. महाराष्ट्राची गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांनी बरीच भावगीते, भक्तिगीते गायली. त्यांनी गायलेले 'ए मेरे वतन के लोगो' हे गाणे अजूनही डोळ्यातून पाणी काढते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडून विश्वविक्रम केला. 
          महाराष्ट्राची लोककला म्हणजे तमाशा व लावणी. तमाशाद्वारे पूर्वी लोकजागृती केली जात असे. महाराष्ट्रात पहिल्यांदा तमाशा सुरु केला तो पठ्ठे बापूराव यांनी. आजसुद्धा काळू बाळू, दत्ता महाडिक, मंगला बनसोडे यांचे तमाशे प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्राचा आत्मा म्हणजे लावणी. रोशन सातारकर, सुलोचना चव्हाण, यमुनाबाई वाईकर, सुरेखा पुणेकर यांनी लावणीला साज चढवला व लावणी अजरामर केली. 
          आपल्या महाराष्ट्राची स्थापना १ मे १९६० रोजी झाली. आपली राजधानी मुंबई आहे. महाराष्ट्राला ७२० कि. मी. चा समुद्रकिनारा लाभला आहे. कोकणसारखा निसर्गसंपन्न व पर्यटकांसाठी आकर्षण ठरणारा प्रदेश लाभला आहे. महाराष्ट्रात एकूण ३५ जिल्हे आहेत. तुळजापूर, कोल्हापूर, पंढरपुर, शिर्डी, त्र्यंबकेश्वर, अक्कलकोट, अष्टविनायक अशी तीर्थक्षेत्र आहेत. पाचगणी, महाबळेश्वर, लोणावळा, माथेरान अशी थंड हवेची ठिकाणे आहेत. प्रतापगड, रायगड, जंजिरा, सिंधुदुर्ग, सिंहगड, पुरंदर असे किल्ले आहेत. अंजठा-वेरूळ लेण्या आहेत. 
          आपल्या महाराष्ट्राला संतांची, समाजसुधारकांची देणगी लाभली आहे. आपला महाराष्ट्र हा थोर विचारवंतांच्या विचारामुळे विकासाच्या दृष्टीने पावले टाकत आहे. महाराष्ट्राला कधी दुष्काळाने तर कधी अतिवृष्टीने घेरले तसेच दंगलींना तर कधी दहशतवादाला धीराने तोंड दिले. महाराष्ट्रावर कितीही संकटे आली तरीही महाराष्ट्र कणखरपणे उभा राहिला. म्हणूनच आपल्याला महाराष्ट्राचा अभिमान वाटतो व म्हणूनच आपण सारे बांधव अभिमानाने म्हणूया, 'जय जय महाराष्ट्र माझा । गर्जा महाराष्ट्र माझा ।।'












 
          











 

























          



































 

Saturday, April 27, 2019

अवीट गोडीचे गाणे -- जय जय महाराष्ट्र माझा


अवीट गोडीचे गाणे -- जय जय महाराष्ट्र माझा

          दिनांक १ मे, १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला. भाषावार प्रांतरचनेच्या चौकटीत महाराष्ट्र निर्माण झाला. परंतु त्यासाठी १०६ हुतात्म्यांना आपले रक्त सांडावे लागले. संयुक्त महाराष्ट्र निर्माण होण्याअगोदर काँग्रेसने मराठी आणि गुजराती बांधवांचे मिळुन द्वैभाषिक राज्य अस्तित्वात आले. परंतु मराठी माणसांनी तत्कालीन कॉंग्रेस सरकारच्या विरोधात आघाडी उघडली आणि एक स्वप्न खंडित स्वरूपात (कारवार, बेळगाव वगळून पण मुंबईसह) साकार केले. गेली कित्येक वर्षे जगण्याच्या , विकासाच्या धडपडीत स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरलेला आपला महाराष्ट्र. दगडांचा, मातीचा, वीरांचा, कलावंतांचा, बुद्धीवंताचा, शास्त्रज्ञांचा....समाजसुधारकांचा आणि ..... राजकारण्यांचा ...... महाराष्ट्र माझा !
          
 जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
 
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ...
 
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
 
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
 

कवि - राजा बढे
संगीत - श्रीनिवास खळे
गायक - शाहीर साबळे

 

Monday, April 22, 2019

तुकाराम महाराज गाथा, अभंग -- कर कटावरी तुळशीच्या माळा ।

तुकाराम महाराज गाथा, अभंग -- कर कटावरी तुळशीच्या माळा ।

कर कटावरी तुळशीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी ।। १ ।।
ठेविले चरण दोन्ही विटेवरी । ऐसें रूप हरी दावीं डोळां ।। २ ।।
कटीं पीतांबर कास मिरवली । दाखवीं वाहिली ऐसी मूर्ती ।। ३ ।।
गरुडपारावरी उभा राहिलासी । आठवे मानसी तेंचि रूप ।। ४ ।।
झुरोनी पांजरा होऊं पाहे आता । येई पंढरीनाथा भेटावया ।। ५ ।।
तुका म्हणे माझी पुरवावी आस । विनंती उदास करू नये ।। ६ ।।

          
           तुकाराम महाराज विठ्ठल भक्तीत अखंड बुडालेले आहेत. त्यांना विठ्ठल भक्तीशिवाय दुसरे काही सुचत नाही. त्यांच्या मुखातून सतत विठ्ठलनामाचा घोष चालू असतो. त्यांच्या डोळ्यापुढे सतत विठ्ठलाचे रूप दिसत असते. त्यांना विठ्ठल भेटीची आस लागलेली आहे. कधी एकदा विठ्ठलाला भेटतो आणि त्याचे मूर्त रूप डोळ्यात साठवतो असे त्यांना झाले आहे. म्हणूनच ते विठ्ठलाला म्हणतात कि, "हे हरी, कंबरेवर हात आहेत आणि गळ्यात तुळशीच्या माळा आहेत, असे तुझे रूप माझ्या डोळ्यांना दाखवावे. दोन्ही पाय विटेवर ठेविले आहेत असे रूप माझ्या डोळ्यांना दाखवावे. कमरेला पीतांबराची कास शोभत आहे अशी तुझी मूर्ती त्वरेने दाखव."
          तुकाराम महाराजांना आता विठ्ठलाला भेटायची आस लागलेली आहे. म्हणूनच ते विठ्ठलाला म्हणतात कि, "गरुडाच्या पारावर उभे राहिलेले असे तुझे रूप माझ्या मनात आठवते. त्याच विषयीच्या झुरणीने शरीर अस्थिपंजर होऊं पाहात आहे. ह्याकरिता पंढरीनाथा भेटावयास या. माझी एवढी आशा पूर्ण करा. ह्या प्रार्थनेचा अव्हेर करू नका."
 









 










 

Saturday, April 20, 2019

अवीट गोडीचे गाणे -- एक लडकी भीगी भागीसी

अवीट गोडीचे गाणे -- एक लडकी भीगी भागीसी 

     एक लडकी भीगी भागीसी हे गाणे चलती का नाम गाडी या चित्रपटातील आहे. हा चित्रपट १९५८ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाची निर्मिती अनुप शर्मा यांनी केली असून दिग्दर्शन सत्येन बोस यांनी केले आहे. या चित्रपटातील गीते मजरुह सुलतानपुरी यांनी लिहिली असून संगीत एस. डी. बर्मन यांनी दिले आहे. या चित्रपटात अशोक कुमार, अनुप कुमार, किशोर कुमार, मधुबाला यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 
          या चित्रपटातील सर्वच गाणी श्रवणीय असून प्रचंड गाजली आहेत. त्यातीलच हे एक गीत. हे गाणे किशोर कुमार व मधुबाला यांच्यावर चित्रित झाले असून किशोर कुमार यांनी गायलेले आहे. 

एक लड़की भीगी भागीसी
सोती रातों में जागी सी
मिली एक अजनबी से
कोई आगे ना पीछे
तुम ही कहो ये कोई बात है

एक लड़की भीगी भागीसी
सोती रातों में जागी सी
मिली एक अजनबी से
कोई आगे ना पीछे
तुम ही कहो ये कोई बात है


दिल ही दिल में चली आती है
बिगड़ी बिगड़ी चली आती है
दिल ही दिल में चली जाती है
बिगड़ी बिगड़ी चली आती है

धुंधलाती हुई बलखाती हुई
सावन के सुनी रातों में
मिली एक अजनबी से
कोई आगे ना पीछे
तुम ही कहो ये कोई बात है
हं...
एक लड़की भीगी भागी सी

डगमग डगमग लहेकि लहेकी
भूली भटकी बहकी बहकी
डगमग डगमग लहेकि लहेकी
भूली भटकी बहकी बहकी

मचली मचली घरसे निकली
पगली सी कली रातों में
मिली एक अजनबी से
कोई आगे ना पीछे
तुम ही कहो ये कोई बात है
हं...
एक लड़की भीगी भागी सी

तन भीगा ही सर गिला है
उस का कोई पेंच भी ढीला है
तन भीगा ही सर गिला है
उस का कोई पेंच भी ढीला है

तन ती झुकती चलती रुकती
निकली अँधेरी रातों में
मिली एक अजनबी से
कोई आगे ना पीछे
तुम ही कहो ये कोई बात है
हं...
एक लड़की भीगी भागीसी
सोती रातों में जागी सी
मिली एक अजनबी से
कोई आगे ना पीछे
तुम ही कहो ये कोई बात है


 














      

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...