Monday, January 20, 2020

धोनीने सन्मानाने निवृत्ती स्वीकारावी

 

धोनीने सन्मानाने निवृत्ती स्वीकारावी 

          महेंद्रसिंग धोनी भारतीय क्रिकेट संघाला पडलेले एक सुंदर स्वप्न होते. त्याने आपल्या फलंदाजीने व हेलिकॉप्टर शॉटने तमाम क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध केले होते. त्याचे यष्टीरक्षणातील चापल्य तर वाखणण्याजोगे होते. डोळ्याचे पाते लवते ना लवते तोच फलंदाजाला यष्टिचीत करून धोनीने फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला आहे. संघ अडचणीत असताना शांत डोक्याने फलंदाजी करून त्याने संघाला विजयी करून दिले आहे तसेच मैदानावर शांत चित्ताने विचार करून प्रतिस्पर्धी संघाविरुध्द आडाखे बांधले आहेत. त्यामुळेच त्याला 'कॅप्टन कूल' हि उपाधी मिळाली आहे. धोनीने २००७ मध्ये झालेली टी - २० विश्वचषक स्पर्धा व २०११ साली झालेली आयसीसी विश्वचषक स्पर्धा जिंकून भारतीय संघाची मान उंचावली. धोनीने यष्टीरक्षक, फलंदाज व कर्णधार या तीनही आघाडयांवर आपली जबाबदारी पेलली. आपल्या निर्णयाचे अचूक टायमिंग राखत त्याने भारतीय संघाला विजयी केले आहे. परंतु निवृत्तीचे त्याचे टायमिंग चुकत आहे. खरेतर भारतीय क्रिकेटला त्याने भरभरून दिले आहे. तसेच आता भारतीय संघात तरूण व उदयोन्मुख खेळाडू खेळत आहेत व चांगली प्रगतीही करत आहेत. अशावेळेस धोनीने संघात येण्याची आशा न बाळगता सन्मानाने निवृत्ती स्वीकारावी व तरूण खेळाडूंना मार्गदर्शन करावे. 
          कोणत्याही श्रेणीत करारबध्द न झाल्याने त्याच्या खेळावर उद्भवलेले प्रश्नचिन्ह त्याच्या निवृत्तीचे संकेत देत आहेत. आज धोनीच्या निवृत्तीची चर्चाच जास्त होताना दिसत आहे. अशावेळेस धोनीनेच निवृत्ती स्वीकारून चर्चेला पूर्णविराम द्यावा. 

 

Sunday, January 19, 2020

Dream and Reality



 Dream and Reality

                What is Dream? Dream is not only what to be done in life. Dream is something where people work hard for being happy in their life. Where peoples are insecure for completing their desire.
                The dream create opportunities in our life. Where we must achieve it and walks in way of success. Dream includes financial-satisfaction, happy working life a good success etc. Dream has power to change our life.
                  While completing  dream we need to walk in bases of reality. “Big dream, big problems and big success”. Yes, for completing dream we get or we faces many difficulties in our life. When we think or runs to achieve the dream, we need to walk in bases of reality. For an example= a boy from poor family who has a dream to become a cricketer also his parents doesn’t give permission to become a cricketer so to complete dream he need to walk in bases of reality, it is True? Everyone faces reality or not in their life.
                            Sometimes reality takes us back or it pulls us back from our dream. But we create confidence in us and we take action and think to face reality then no one can stop us to make our dream successfully and to win it.
                               To complete dream failurity sometime comes in front of us but “Failurity is begin of success” and when we faces our failurity when we can can win our dream and achieve success in our life. So to achieve dream “Never give up” and think a big. “Dream is not easy, But success is more” 

TEJAS SANTOSH JOSHI 
GANGAPURI, WAI
DIST SATARA


 

कविता -- कावळे दादाचे दुःख

 
कविता -- कावळे दादाचे दुःख 


पक्षी गातात झाडांवर,
फुलपाखरे खेळतात फुलांवर, 
कोकीळ गाते आंब्यावर, 
कावळेदादा का दुःखाने बसला 
सुकलेल्या झाडावर ? ।। १ ।।

आनंदाने पावसात नाचतो मोर, 
पोपट विठूविठू करतो पेरूच्या झाडावर, 
चिमणी घरटं बांधते झाडावर,
कावळेदादा का दुःखाने बसला 
सुकलेल्या झाडावर ? ।। २ ।।

दुरून हिरवेगार दिसतात डोंगर,
वाटे हिरवा सदरा घातला अंगावर,
झाडे नाचतात वाऱ्यावर,
कावळेदादा का दुःखाने बसला 
सुकलेल्या झाडावर ? ।। ३ ।।

माकड उडया मारते झाडावर,
वेड लागेल कावळेदादा तुला लवकर,
तू पण सर्वांबरोबर मौजमजा कर,
नको बसू त्या सुकलेल्या झाडावर ।। ४ ।।













 











 

Saturday, January 11, 2020

तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- तीळ जाळिले तांदूळ ।


तुकाराम महाराज गाथा -- अभंग -- तीळ जाळिले तांदूळ ।

तीळ जाळिले तांदूळ । काम क्रोध तैसेचि खळ ।। १ ।।
का रे सिणलासी वाऊगा । न भाजता पांडुरंगा ।। २ ।।
मानदंभासाठी । केली अक्षरांची आटी ।। ३ ।।
तप करुनि तीर्थाटन । वाढविला अभिमान ।। ४ ।।
वाटिले ते धन । केली अहंता जतन ।। ५ ।।
तुका म्हणे चुकले वर्म । केला अवघाचि अधर्म ।। ६ ।।

ओवी : तीळ जाळिले तांदूळ । काम क्रोध तैसेचि खळ ।। १ ।।
अर्थ : अग्नीत तीळ तांदूळाचे हवन करणाऱ्या करणाऱ्या साधकांना तुकाराम महाराज सांगतात कि, अरे मुख्य पीडक जे कामक्रोधातीक विकार ह्या खळांना जसेचे तसे ठेवून बाहेरचे गरीब तीळ तांदूळ यांना का जाळतोस?
भावार्थ : या ओवीतून तुकाराम महाराजांना असे म्हणायचे आहे कि, बरेच लोक आपल्या मनाला शांती मिळण्यासाठी होम-हवन करतात. आपल्या स्वार्थासाठी या होमामध्ये तीळ, तांदूळ, लाकूड इ. टाकतात. काही वेळा पशु पक्ष्यांचा बळी दयायला कमी करत नाहीत. तुकाराम महाराजांना हे खोटेपणाचे व दांभिकपणाचे कृत्य वाटते. या कृत्यापासून पुण्य व मनाला शांती मिळणेऐवजी पशुहत्येचे पाप मात्र लागते.  तसेच तीळ तांदूळ जाळल्याने मन:शांती मिळते हा लोकांचा भ्रम आहे. कारण आपल्या शरीरात क्रोध, कपट, असत्याने वागणे, मत्सर, वासना इ. मनाला पीडा देणारे विकार आहेत तोपर्यंत मनाला शांती मिळणार नाही. तुकाराम महाराजांच्या मते मनःशांती मिळवण्यासाठी अग्नीत तीळ-तांदूळ जाळण्याऐवजी शरीराला पीडा देणारे कामक्रोधादिक विकारांना जाळावे.
ओवी : का रे सिणलासी वाऊगा । न भाजता पांडुरंगा ।। २ ।। मानदंभासाठी । केली अक्षरांची आटी ।। ३ ।।
अर्थ : अरे, एका पांडुरंगाला न स्मरता ह्या व्यर्थ खटाटोपाचा का शीण घेतोस ? ग्रंथाक्षरांचे जे पाठ पाठांतर केलेस ते केवळ मान मिळावा व दंभ वाढवावा एवढ्याचकरीता. 
भावार्थ : काही लोक पुण्य पदरात पडावे व मनःशांती मिळावी यासाठी मोठं-मोठे होम, यज्ञ करतात. तसेच मोठमोठाले ग्रंथ वाचतात. त्याचे पाठांतर करतात. तुकाराम महाराजांच्या मते हा केलेला खोटा व व्यर्थ खटाटोप आहे. यातून देवाची भक्ती होण्याऐवजी स्वतःचे नाव मात्र होईल. ग्रंथाचे पाठांतर केल्याने सगळे जग वाहवा करील. एकदा जगाने वाहवा करायला सुरवात केल्यावर 'माझ्या सारखा मीच' असा अहंकार अंगी येईल. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि, ग्रंथाचे पाठांतर करण्यापेक्षा पांडुरंगाचे स्मरण केल्यावर, त्याचे नामःस्मरण घेतल्यावर मनःशांती मिळते. 
ओवी : तप करुनि तीर्थाटन । वाढविला अभिमान ।। ४ ।। वाटिले ते धन । केली अहंता जतन ।। ५ ।। तुका म्हणे चुकले वर्म । केला अवघाचि अधर्म ।। ६ ।।
अर्थ : नानाप्रकारे तप तीर्थाटन करून त्या विषयीचा अभिमान तू आपल्या ठिकाणी वाढता केलास. त्याचप्रमाणे दुसऱ्याला द्रव्य-दान देऊन मी मोठा दाता अशा अहंतेचे मात्र रक्षण केलेस. 
भावार्थ : या अभंगातून तुकाराम महाराजांना असे सुचवायचे आहे कि, नुसते तप करून किंवा तीर्थक्षेत्रे फिरून मोक्ष मिळत नाही. त्यासाठी देवाची बरीच आराधना करावी लागते. मनापासून देवाची भक्ती करावी लागते. काही लोक बरेच तप करतात. तीर्थक्षेत्रे फिरतात. पण ते दुसऱ्यांना दाखवण्यासाठी. स्वतःचा अभिमान बाळगण्यासाठी. यात यःकिंचितही भक्तीचा लवलेश नसतो. हे केलेले वरवरचे ढोंग असते. तसेच काहीजण दुसऱ्यांना दाखवण्यासाठी दानधर्म करतात. पण जो भुकेला आहे अशा लोकांना लाथेने तुडवतात. ज्याला खरंच अन्न वस्त्राची गरज आहे अशांकडे दुर्लक्ष करतात. ज्याला द्रव्याची किंमत नसूनही दिखावा करण्यासाठी दानधर्म करतात व मी दाता आहे असे मिरवतात. तुकाराम महाराजांच्या मते असे स्वार्थी व ढोंगी लोक असे अधर्म कृत्य करून व चुकीच्या मार्गाने गेल्याने त्यांना मोक्ष व आत्मप्राप्ती होत नाही.


















 




































 



 

Friday, January 10, 2020

कविता -- नवरा

 कविता -- नवरा 

नवरा जर नसेल तर 
राजवाडा पण सुना आहे,
नवऱ्याला कमी लेखणे हा 
अक्षम्य गुन्हा आहे ।

खरं पाहिलं तर त्याच्याशिवाय 
कोणतेही पान हालत नाही... 
घरातलं कोणतंच सुख 
नवऱ्याशिवाय फुलत नाही... 

नोकरी अन पगाराशिवाय 
नवऱ्याजवळ असतं काय,
असं म्हणणाऱ्यांना आता 
सांगाव तरी काय ?

स्वच्छ, पवित्र घरच मुळी 
नवऱ्यानच घेतलेलं असत,
मात्र विचित्र माणूस म्हणून 
सौन्दर्य त्याला हसत बसतं. 

पगार मर्यादित असूनसुध्दा 
सर्वांना त्यास पोसायचे असते... 
म्हणूनच नवऱ्याचे वय 
बायकोपेक्षा जास्त असते... 

त्याचा दोष काय तर म्हणे 
काटकसर करायला लावतो,
कुटुंबाच्या कल्याणासाठी 
बिचारा रात्रंदिवस धावतो. 

नवरा म्हणजे अंगणामागचा 
भक्कम चिरेबंदी वाडा !
बायको म्हणजे यात ठेवलेला 
पवित्र अमृतघडा !

नवरा म्हणजे सप्तरंगी 
इंद्रधनुष्यामागचं आभाळ !
सौन्दर्य खुलवणाऱ्या कुंकवामागचं 
भव्य-दिव्य उदार भाळ !

कधीतरी चारचौघात 
त्याच हि कौतुक करावं !
त्याच्या अबोल दुःखाचं 
एक तरी गीत लिहावं !




















 




















 




















 

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...