Wednesday, September 15, 2021

अमर अकबर अँथोनी

 

 अमर अकबर अँथोनी 

           हा चित्रपट २७ मे १९७७ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक मनमोहन देसाई आहेत. या चित्रपटाची कथा जीवनप्रभा देसाई यांनी लिहिली असून पटकथा प्रयागराज यांनी लिहिली आहे. कादर खान यांनी संवाद लिहिले आहेत. या चित्रपटातील गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली असून लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केली आहेत. ह्या चित्रपटातील गाणी मोहमद रफी, किशोर कुमार, लता मंगेशकर, मुकेश, महेंद्र कपूर, शैलेंद्र सिंग यांनी गायली आहेत. अमिताभने किशोर कुमार समवेत 'माय नेम इज अँथोनी गोन्साल्विस' हे गाणे गायले आहे. 'अमर अकबर अँथोनी' हे टायटल सॉंग अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, ऋषी कपूर यांच्यावर चित्रित झालेले गाणे लोकप्रिय झाले. 

          अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, ऋषी कपूर, नीतू सिंग, परवीन बॉबी, शबाना आझमी, निरुपा रॉय, प्राण, जीवन यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

           या चित्रपटाची कहाणी तीन भावांवर आधारीत आहे. हे तीन भाऊ लहानपणी एकमेकांपासून वेगळे होतात व तीन धर्मांच्या परिवारातील लोक त्यांचा सांभाळ करतात. अमर (विनोद खन्ना) हिंदू धर्मात जातो व पोलीस इन्स्पेक्टर बनतो. अकबर (ऋषी कपूर) मुस्लिम धर्मात जातो व गायक बनतो. अँथोनी (अमिताभ बच्चन) ख्रिश्चन धर्मात जातो व देशी दारूच्या दुकानाचा मालक होतो.   हे तिघेही एका दिवशी रस्ता अपघातात जखमी झालेल्या महिलेचा जीव वाचवण्यासाठी रक्त देतात. त्या तिघांना माहिती नाही की ती त्यांची आई भारती आहे, जी फूल विक्रेते म्हणून काम करते.

अकबर डॉक्टर सलमा अली ( नीतू सिंग ) च्या प्रेमात पडतो . पण त्याचे वडील तैयब अली यांना अकबर अजिबात आवडत नाही. पण एकदा घरात आग लागली की तो त्या लोकांना घराच्या आगीपासून वाचवतो आणि या घटनेपासून तो तिला आवडायला लागतो. अमर लक्ष्मी ( शबाना आझमी ) च्या प्रेमात पडतो , जो तिच्या सावत्र आईच्या अत्याचाराला बळी पडला आहे. अमर तिच्या सावत्र आईला, तिच्या आजीला अटक करतो आणि तिला पुन्हा घरी आणतो. लंडनहून भारतात आलेल्या जीनी ( परवीन बाबी ) च्या प्रेमात अँथनी पडतो .

            रॉबर्टने जेनीचे अपहरण केले, तर लक्ष्मीचा तिचा भाऊ रणजीतनेही अपहरण केले, जो रॉबर्टसाठी काम करतो.  अमर, अकबर आणि अँथनी हे तिघे मिळून वेषांतर करून सलमाबरोबर रॉबर्टच्या घरात  शिरले. सलमा जैनी आणि लक्ष्मीची सुटका करते. त्याच वेळी, तीन भाऊ रॉबर्ट आणि त्याच्या गुंडांची हत्या करतात आणि त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करतात. किशनलालला त्याच्या जुन्या गुन्ह्यांसाठी पुन्हा शिक्षा मिळते, पण तो भारतीला सांगतो की आता त्याची तीन मुले एक झाली आहेत आणि हेच महत्त्वाचे आहे. यासह कथा संपते.

अमिताभचा विनोदी सीन --

          अमिताभ बच्चन दारू पिऊन व बॉक्सिंग रिंगमध्ये मार खाऊन जखमी अवस्थेत आपल्या खोलीत येतो. आरशासमोर उभे राहतो आणि आरशातील आपल्याच प्रतिमेबरोबर बोलत राहतो व आरशातील प्रतिमेलाच अँथोनी समजून मलमपट्टी करतो. खरे तर हा दोन मिनिटाचा सीन पण अमिताभने केलेल्या विनोदी अदाकारीमुळे हा सीन कायम लक्षात राहणारा आहे व प्रेक्षकांना हसवत ठेवणारा आहे. 

 अँथोनी गोन्साल्विस पात्राची रंजक कथा --

          दिग्दर्शक मनमोहन देसाई यांना अमिताभच्या पात्रासाठी पहिल्यांदा अँथोनी फर्नांडिस या नावाची योजना केली. मनमोहन देसाई यांनी आनंद बक्षींकडून 'माय नेम इज अँथोनी फर्नांडिस' हे गाणेही लिहून घेतले. देसाई यांनी संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना हे गीत ऐकवले परंतु त्यांना अँथोनी फर्नांडिस हे नाव काही रुचले नाही. प्यारेलाल यांनी प्रसिद्ध संगीतकार व व्हायोलिन वादक अँथोनी गोन्साल्विस यांचे नाव देण्यास सुचविले व गाण्यात 'माय नेम इज अँथोनी फर्नांडिस' ऐवजी 'माय नेम इज अँथोनी गोन्साल्विस' हा बदल करण्यास सांगितला. अशा तऱ्हेने अमिताभने साकारलेले अँथोनी गोन्साल्विस हे पात्र प्रसिद्ध संगीतकार व व्हायोलिन वादक अँथोनी गोन्साल्विस यांचे नावावरून सुचले व प्रसिद्धही झाले. 

           'माय नेम इज अँथोनी गोन्साल्विस' या गाण्यात अमिताभने विनोदी अभिनय केला आहे. हे गाणे अमिताभ व परवीन बॉबी यांच्यावर चित्रित केले आहे. या गाण्याचे वैशिष्टय म्हणजे अमिताभने किशोर कुमार समवेत गाणे गायले आहे. 

विलक्षण योगायोग --

          चार प्रसिद्ध दिग्गज गायकांनी एकत्र येऊन चित्रपटासाठी गाणे गायचे म्हणजे विलक्षण योगायोगच म्हणायला हवा व हा विलक्षण योगायोग जुळून आला तो या चित्रपटातील 'हमको तुमसे हो गया है प्यार क्या करे' या गाण्याच्या वेळेस. मोहमद रफी, मुकेश, किशोर कुमार व लता मंगेशकर ह्या चार नावाजलेल्या गायकांनी त्यांच्या कारकिर्दीतील पहिल्यांदाच एकत्रितपणे  येऊन हे गीत गायले. ह्या गाण्यामध्ये मोहमद रफी ऋषी कपूरसाठी, मुकेश विनोद खन्नासाठी, किशोर कुमार अमिताभ बच्चनसाठी गायले तर लता मंगेशकर शबाना आझमी, नितु सिंग, परवीन बॉबी यांच्यासाठी गायल्या. 

          अमिताभ बच्चनला उत्कृष्ठ अभिनयामुळे फिल्मफेअर तर्फे दिला जाणारा 'बेस्ट ऍक्टर' चा पुरस्कार मिळाला.

         

 









 

 

 

 

 

 

 

 

 

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...