Saturday, September 29, 2018

अखेर खरे वाघ लढले, अशिया कपवर भारताचे नाव कोरले.




अशिया कप जिंकल्यावर आनंदोत्सव साजरा करताना भारतीय खेळाडू 

अखेर खरे वाघ लढले, अशिया कपवर भारताचे नाव कोरले. 

          अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या अत्यंत चुरशीच्या लढतीत भारताने बांगलादेशवर ३ गडी राखत विजय मिळवला आणि अशिया कपवर आपले नाव कोरले. 
               विजयासाठी ६ चेंडूत ६ धावा पासून ते शेवटच्या चेंडूवर १ धाव असा श्वास रोखून धरायला लावणारा हा सामना शेवटपर्यंत रंगला. कधी भारताचे पारडे जड होत होते तर कधी बांगलादेशचे पारडे जड होत होते. भारत जिंकणार कि बांगलादेश जिंकणार हे शेवटच्या चेंडूपर्यंत कळत नव्हते. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळावी लागणार हि शक्यतासुद्धा वर्तवली जात होती. परंतु शेवटच्या चेंडूवर धाव घेऊन भारताने सातव्यांदा अशिया कप जिंकला. हा सामना खरोखरच अंतिम सामन्याला साजेसाच ठरला. 
               हा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळवला गेला. या सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. लिटन दास आणि मेहंदी मिराज जोडीने डावाला सुरवात केली. दासने उत्कृष्ट खेळी करत ११७ चेंडूत १२१ धावा केल्या. यात त्याने १२ चौकार व २ षटकार मारले. मोर्तझाने फटकेबाजी करत धावा वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याने कुलदीप यादवला एका षटकात षटकार खेचला परंतु याच षटकात धोनीने त्याला यष्टिचित करून त्याची खेळी संपवली. एका बाजूने फलंदाज बाद होत असताना सौम्य सरकारने एका बाजूने किल्ला लढवत ठेवून बांगलादेशला दोनशेचा टप्पा ओलांडून दिला. अखेर ४९ व्या षटकात सौम्या धावबाद झाला तर बुमराहने रुबेल हुसेनचा त्रिफळा उडवून बांगलादेशचा डाव २२२ धावात संपवला. भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत बांगलादेशला २२२ धावात रोखले. 
               बांगलादेशने दिलेल्या माफक २२२ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक यांनी चांगली फलंदाजी केली. हे खेळत होते तेव्हा सामना भारत सहज जिंकणार असे वाटत होते परंतु हे दोघे बाद झाले आणि भारताची फलंदाजी ढेपाळली. अफगाणिस्तान सामान्याप्रमाणेच या सामन्याची स्थिती होऊन रवींद्र जडेजावरच भारताला जिंकून देण्याची जबाबदारी आली. पण तो बाद झाल्यानंतर जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या १६ धावा काढताना भारताच्या नाकीनऊ आले. भुवनेश्वर कुमार, केदार जाधव, कुलदीप यादव यांनी अखेरपर्यंत किल्ला लढवत विजयश्री खेचून आणली व भारताला सातव्यांदा अशिया कप मिळवून दिला. 
               या सामन्यात दोन्ही संघांनी फलंदाजी व गोलंदाजी उत्कृष्ट केली त्यामुळेच हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला व प्रेक्षकांनासुद्धा या सामन्याचा आनंद लुटला आला. 



























No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...