Saturday, July 16, 2022

याराना - घट्ट मैत्रीचे नाते

 याराना - घट्ट मैत्रीचे नाते

          हा चित्रपट २३ ऑक्टोबर १९८१ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माता एच. ए. नाडियाडवाला असून राकेश कुमार यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाची कथा ज्ञानदेव अग्निहोत्री यांनी लिहिली असून पटकथा विजय कौल यांनी लिहिली आहे. कादर खान यांनी संवाद लिहिले आहेत. या चित्रपटातील गाणी अंजान यांनी लिहिली असून राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केली आहेत. या चित्रपटातील गाणी किशोर कुमार यांनी गायली असून 'बिशन चाचा कुछ गाओ' हे एकमेव गीत मोहमद रफींनी गायले आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, अमजद खान, नीतू सिंग, तनुजा, कादर खान, जीवन, रंजीत यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

          या चित्रपटात अमजद खानने सकारात्मक भुमिका केली. या आधी अमिताभच्या चित्रपटात त्यांनी खलनायकाची भुमिका केली होती. या चित्रपटात अमजद खान अमिताभचा मित्र दाखवला आहे व अमिताभच्या गायकीला प्रोत्साहन देताना दाखवला आहे. अमिताभच्या गायकीसाठी अमजद खान आपले सर्वस्व गमावतो. अमजद खानने निस्वार्थ मित्राची भूमिका केली आहे. या भूमिकेमुळे अमजद खानला फिल्मफेयर तर्फे दिला जाणारा 'सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेता' चा पुरस्कार दिला. 

          या चित्रपटातील 'सारा जमाना हसींनोका दिवाना' हे गाणे चांगलेच लोकप्रिय झाले. या गाण्याचे वैशिष्ट म्हणजे या गाण्यात अमिताभच्या ड्रेसला इलेक्ट्रिक बल्ब बसवले होते व अमिताभ नाचत असताना तो स्वतः हे बल्ब कपड्याच्या आतून एकाचवेळेस संपूर्ण तादात्म्य राखून ऑपरेट करत होता. हे गाणे बघण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करीत होते. 

अमिताभचे काही विनोदी सीन -

अमिताभचा विनोदी डान्स 

          विजू खोटे सर्वांना डान्स शिकवत असतो. यात अमिताभही असतो. अमिताभ विचित्र डान्स करत असताना दोघा-तिघांना फाईटही मारतो. हळूहळू सर्वजण एकमेकांना फाईट मारू लागतात व डान्सचे रूपांतर हाणामारीत होते. 

कच्चा पापड पक्का पापड 

          मास्टरजी अमिताभला शिकवताना वाचायला लावतात पण अमिताभला नीट वाचता येत नाही तेव्हा मास्टरजी अमिताभला म्हणतात, 'एक शब्दभी तुम्हारे जबानसे सही नही निकलता' तेव्हा अमिताभ मास्टरजीना 'कच्चा पापड पक्का पापड' म्हणायला लावतो. मास्टरजी म्हणायचा प्रयत्न करतात पण त्यांना जमत नाही. हळूहळू बिल्डिंगमधले सगळे लोक 'कच्चा पापड पक्का पापड' म्हणायला लागतात. शेवटी नीतू सिंगही 'कच्चा पापड पक्का पापड' म्हणायचा प्रयत्न करते व म्हणताना तिचीही तारांबळ उडते. 

कथानक -

        किशन आणि बिशन हे बालपणीचे मित्र असतात. किशन हा अनाथ पण स्वावलंबी आणि मेहनती आहे, तर बिशन हा श्रीमंत पार्श्वभूमीतून आला आहे. दोघांमधील मैत्री खूप घट्ट आहे आणि हीच मैत्री बिशनच्या मामाची डोकेदुखी आहे. बिशनच्या मामाचा त्याच्या बहिणीच्या मालमत्तेवर डोळा आहे. दोन मित्रांना वेगळे करण्यासाठी मामा आपल्या बहिणीला बिशनला पुढील शिक्षणासाठी शहरात आणि नंतर परदेशात पाठवण्यास सांगतात.

           जेव्हा दोन मित्र पुन्हा एकत्र येतात. किशन शंकराच्या देवळात 'भोले ओ भोले' हे गाणे म्हणत असतो तेव्हा बिशन ( अमजद खान ) ला कळते की किशन ( अमिताभ बच्चन ) चा आवाज खूप छान आहे.बिशन हे गाणे रेकॉर्ड करतो. बिशन आता एक यशस्वी उद्योगपती आहे आणि त्याला किशनच्या गायन प्रतिभेला प्रोत्साहन द्यायचे आहे. किशन त्याच्या मित्रासोबत शहरात जातो, तिथे बिशन कोमल ( नीतू सिंग) ला भेटतो व किशनला कलाकार आणि  चांगला माणूस होण्यासाठी तयार करायला सांगतो. दरम्यान, बिशनला समजते  की गेल्या 18 वर्षांपासून मामा आणि त्यांच्या मुलाने कौटुंबिक मालमत्तेची पद्धतशीरपणे लूट केली आहे. यशस्वी गायक होण्यासाठी किशनला आपली उरलेली संपत्ती गहाण ठेवायला भाग पाडले जाते. यामुळे बिशन आणि त्याची पत्नी यांच्यात मोठे भांडण होते, ज्याला खात्री आहे की किशन यशस्वी झाल्यास बिशनकडे पाठ फिरवेल. किशनचा पहिला गाण्याचा कार्यक्रम खूप यशस्वी ठरतो  आणि तो त्याचा मित्र बिशनची गहाण ठेवलेली संपत्ती वाचवण्यासाठी त्याची कमाई दान करतो. जेणेकरून त्याची वहिनी आणि प्रिय भाचा (बिशनचा 10 वर्षांचा मुलगा) घरी परत येऊ शकेल.

          किशन पुढे सेलिब्रिटी बनतो आणि कोमल त्याच्यावरचे प्रेम व्यक्त करते. दरम्यान, बिशन त्याचा विश्वासघातकी मामा ( जीवन ) आणि चुलत भाऊ ( रणजीत ) यांनी रचलेल्या कटात पडतो . अनेक ओलिसांसह बिशनचे अपहरण केले जाते. तेथे बिशनने मानसिक स्थिरता गमावली आणि छळ आणि छळामुळे तो शॉकमध्ये जातो. त्यानंतर त्याला मानसिक आश्रय दिला जातो आणि नंतर त्याला स्मृतिभ्रंश होतो. किशन मानसिक आजारी असल्याचे भासवून अधिकाऱ्यांना फसवून आश्रयस्थानात प्रवेश करतो. व बिशनची आठवण परत आणतो. ओलिसांच्या पलायनाने चित्रपट संपतो - कुटुंब पुन्हा एकत्र येते आणि विश्वासघातकी लोकांना तुरुंगात पाठवले जाते. 

          अमिताभच्या विनोदी अभिनयामुळे व 'सारा जमाना' या गाण्यामुळे हा चित्रपट सुपरहिट झाला. 


सुपर हिट गाणे 'सारा जमाना हसींनोका दिवाना'














 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...