Sunday, May 9, 2021

 त्रिशूल - पिता पुत्राचा संघर्ष 

          सन १९७८ मध्ये प्रदर्शित झालेली हि चित्रपट निर्मिती. या चित्रपटाचे निर्माता गुलशन राय असून दिग्दर्शन यश चोप्रा यांचे आहे. या चित्रपटातील गाणी साहिर लुधियानवी यांनी लिहिली असून खय्याम यांनी संगीत दिले आहे. या चित्रपटातील गाणी लता मंगेशकर, नितीन मुकेश, किशोर कुमार, येसूदास, पामेला चोपडा यांनी गायली आहेत.  अमिताभला डोळ्यासमोर ठेवून सलीम जावेद यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे. 

          या चित्रपटात संजीव कुमार, अमिताभ बच्चन, शशी कपूर, राखी, वहिदा रहेमान, हेमा मालिनी, पूनम धिल्लो, सचिन, प्रेम चोपडा यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत. हा चित्रपट संजीव कुमार, अमिताभ बच्चन व शशी कपूर या तिघांवर केंद्रित केला आहे. हा चित्रपट पिता पुत्राच्या संघर्षांवर आधारित आहे. संजीव कुमारने अमिताभच्या सावत्र बापाची भूमिका केली आहे तर शशी कपूर व पुनम धिल्लो अमिताभचे सावत्र बहीण भाऊ दाखवले आहेत. वहिदा रेहमानने अमिताभच्या आईची भुमिका साकारली आहे. अमिताभने विजय कुमारची भुमिका उत्तम वठवली आहे. संजीव कुमार व अमिताभ बच्चन यांच्यातील संघर्षाचे चित्रण उत्तम वठवले आहे. 

          सासऱ्याच्या मोठया बांधकाम व्यवसायात भागीदारी मिळतीय हे लक्षात आल्यावर व झटपट पैसा मिळवून श्रीमंत होण्यासाठी संजीव कुमार आपली प्रेयसी वहिदा रेहमानचा त्याग करतो व कामिनीशी लग्न करतो. वहिदा रेहमान हि गर्भवती असते परंतु संजीव कुमारला श्रीमंतीची भुरळ पडलेली असते. संजीव कुमारपासून वेगळी झालेली वहिदा रेहमान एका बाळाला जन्म देते. ती त्याचे नाव विजय ठेवते व त्याला शरीर व मनाने कणखर बनवते. 

          आपल्या आईला फसवून तिच्या बरबादीचे कारण बनलेल्या आपल्या पित्याचा सूड घेण्यासाठी व त्याची संपत्ती, व्यवसाय बरबाद करण्यासाठी दिल्लीला जातो. दोघांच्यात मग संघर्ष निर्माण होतो. विजय काही चांगले सौदे करतो त्यामुळे संजीव कुमारला व्यवसायात नुकसान होते. दोघांच्यात जरी संघर्ष होत असला तरी अमिताभला संजीवकुमार विषयी अपशब्द काढलेले आवडत नाहीत. शेवटी प्रेम चोपडा अमिताभला गोळी मारणार असतो तेवढयात संजीव कुमार मध्ये पडतो व गोळी त्याला लागते. मरणाच्या आधी संजीव कुमारला पश्चाताप होतो व अमिताभची माफी मागतो. अमिताभ संजीव कुमारला माफ करतो व कुटुंबासमवेत राहतो. 

          या चित्रपटात अमिताभ बच्चन व संजीव कुमार या अभिनयातील दिग्गज कलाकारांनी आपल्या अभिनयाची चमक प्रेक्षकांना दाखवली. अमिताभचे चित्रपट म्हणले कि प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करतातच, त्यातीलच हा एक चित्रपट. अमिताभसुध्दा प्रेक्षकांना चित्रपट बघण्याचा भरभरून आनंद देतो. 

          अमिताभचे चित्रपट आणि त्यातील संवाद हे एक समीकरणच झालेले आहे. त्याचे दमदार संवाद ऐकण्यासाठी प्रेक्षक चित्रपटात गर्दी करतात. ह्या चित्रपटातही अमिताभचे काही दमदार संवाद आहेत. हे संवाद   आजही दाद देवून जातात. 

१) मै पांच लाख का सौदा करने  आया हूँ ... और मेरी जेब में पांच फूटी कौडियाभी नही हें ।

२) मुझे पांच मिनिट ना मिलकर ... अपने अपना पांच लाख का नुकसान किया हैं । 

३) जिसने पच्चीस बरस अपनी माँ को हर रोज थोडा थोडा मरते देखा हो ... उससे मौत से क्या डर लग्ना ।

४) मेरे पास अपने बाप दादा कि दौलत कि नही, एक पैं है, और नही मुझे चाहिये ... मेरे पास अगर कुछ है तो  अपनी  माँ का दिया हुवा आशीर्वाद ।

         

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

         

No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...