Monday, October 26, 2020

अवीट गोडीचे गाणे -- विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी


 अवीट गोडीचे गाणे -- विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी

          हे भावगीत गायले आहे माणिक वर्मा यांनी. या गीताला संगीत दिले आहे बाळ माटे यांनी. हे गीत लिहिले आहे योगेश्वर अभ्यंकर यांनी. 

         जेव्हा प्रभू रामचंद्र रावणाचा वध करून अयोध्या नगरीत परतात तेव्हा अयोध्या नगरी आनंदाने फुलून उठते. प्रभू रामचंद्र वनवास संपवून अयोध्या नगरीत परत येतात तेव्हा प्रत्येकाच्या मनात आनंद उत्पन्न झालेला असतो. अयोध्या नगरीत मंगलमय वातावरण तयार झालेले असते. प्रत्येकाच्या घरावर गुढयातोरणे उभारल्या जातात. घरासमोर रांगोळ्या काढल्या जातात. गुलाल उधळला जातो. सनई चौघडे  वाजवले जातात. फुलांचा सडा शिंपडला जातो. आपला आवडता राजा घरी परत आला आहे म्हणून प्रभू रामचंद्र कि जय असा गजर सगळीकडे चालू असतो. एकूणच संपुर्ण अयोध्या नागरी प्रभू रामचंद्रांच्या भक्तीत तल्लीन झालेली आहे. 

           

विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी
प्रभू आले मंदिरी

गुलाल उधळून नगर रंगले, भक्तगणाचे थवे नाचले
रामभक्तीचा गंध दरवळे, गुढ्यातोरणे घरोघरी ग

आला राजा अयोध्येचा, सडा शिंपला प्राजक्ताचा
सनई गाते मंजुळ गाणी, आरती ओवाळती नारी

श्रीरामाचा गजर होऊनी, पावन त्रिभुवन झुकते चरणी
भक्त रंगले गुणी गायनी, भक्ती युगाची ललकारी ग

 


 

No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...