Saturday, October 10, 2020

तुकाराम महाराज अभंग -- चित्त समाधान । तरी विष वाटे सोने ।।

 तुकाराम महाराज अभंग --  चित्त समाधान । तरी विष वाटे सोने ।।

चित्त समाधान । तरी विष वाटे सोने ।। १ ।।

बहु खोटा अतिशय । जाणा भले सांगो काय ।। २ ।।

मनाचे तळमळे ।  चंदनेही अंग पोळे ।। ३ ।।

तुका म्हणे दुजा । उपचार पीडा पूजा ।। ४ ।। 

          "चित्ताचे जर समाधान असेल तर विषवत असणारे दुःख सोन्यासारखे वाटते." या ओवीतून तुकाराम महाराजांना असे सुचवायचे आहे  कि, जर आपले मन समाधानी असेल, मनात कुठलाही लोभ नसेल तर आपल्याला जे दुःख होईल ते विषासारखे न वाटता सोन्यासारखे वाटेल म्हणजेच होणाऱ्या दुःखातूनही सुख वाटेल. "विषयाची हाव अतिशय असणे हे फार खोटे आहे." यातून असे सुचवायचे आहे कि एखादया गोष्टीबद्दल म्हणजेच संपत्ती, धन-द्रव्य, किंमती सुवर्णअलंकार याबद्दल अतिशय हाव बाळगली किंवा लोभ सुटला तर तो वाईटच आहे कारण तो शेवटी विनाशाकडे नेतो. म्हणूनच जास्त हाव न बाळगता जे आहे त्यातच समाधान मानले म्हणजे वाईट वाटणार नाही. "मन जर तळमळ करीत असेल तर चंदनाचे उटीनेही अंग भाजते. मन अस्वस्थ असेल तर अन्य  सुखोपचाराची पूजा केल्याने पीडा होते." तुकाराम महाराजांना असे सांगायचे आहे कि, एखादया गोष्टीबद्दल म्हणजेच संपत्ती, धन-द्रव्य, किंमती सुवर्णअलंकार याबद्दल अतिशय हाव बाळगली किंवा लोभ सुटला व ती गोष्ट मिळवण्यासाठी  मन तळमळ करीत असेल किंवा आतल्या आत जळत असेल तर चंदनासारख्या   थंडगार वस्तूने सुद्धा आग शांत होणार नाही. व एखादी गोष्ट मिळत नाही म्हणून मन अस्वस्थ होत असेल तर दुसरे कुठलेही सुख पुढे टाकले तरी मनाचे समाधान होणार नाही. उलट ती गोष्ट मिळत नसल्याने दुःखच होणार.











 

No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...