Saturday, November 14, 2020

 

अवीट गोडीचे गाणे - सेतू बांधा रे सागरी - गीतरामायण 

 

           'सेतू बांधा रे सागरी' हे गीत गीतरामायण मधील आहे. बाबूजी अर्थात सुधीर फडके यांनी आपल्या अवीट आवाजात हे गीत गायले आहे व त्यांनीच हे गीत संगीतबध्द केले आहे. हे गीत ग. दि. माडगूळकर यांनी लिहिले आहे. 

          गीत रामायण हा कार्यक्रम १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत पुणे आकाशवाणीवर प्रसारित झाला. या कार्यक्रमात एकूण ५६ गीते प्रसारित झाली. या कार्यक्रमाचे वैशिष्टय म्हणजे हि सर्व गीते ग. दि. माडगुळकर यांनी लिहिली असून बाबूजी यांनी संगीतबध्द केली व आपल्या अवीट आवाजात गायली. गीतरामायणातील सर्वच गाणी अवीट गोडीची असून कानांना तृप्त करणारी आहेत. त्यातीलच हे एक गीत. 

बांधा सेतू, सेतू बांधा रे सागरीं

गिरिराजांचे देह निखळूनी

गजांगशा त्या शिळा उचलुनी

जलांत द्या रे जवें ढकलुनी

सेतुबंधने जोडुन ओढा समीप लंकापुरी

फेका झाडें, फेका डोंगर

पृष्ठीं झेलिल त्यांना सागर

ओढा पृथ्वी पैलतटावर

वडवाग्नी तो धरील माथीं सेतू शेषापरी

रामभक्ति ये दाटुनि पोटीं

शततीर्थांच्या लवल्या पाठी

सत्कार्याच्या पथिकासाठीं

श्रीरामाला असेच घेती वानर पाठीवरी

नळसा नेता सहज लाभतां

कोटी कोटी हात राबतां

प्रारंभी घे रूप सांगता

पाषाणाच हे पहा लीलया तरती पाण्यावरी

चरण प्रभुचे जळांत शिरतां

सकळ नद्यांना येइ तीर्थता

आरंभास्तव अधिर पूर्तता

शिळा होउनी जडूं लागल्या, लाट लाटांवरी

गर्जा, गर्जा हे वानरगण!

रघुपती राघव, पतीतपावन

जय लंकारी, जानकिजीवन

युद्धाआधी झडूं लागु द्या स्फूर्तीच्या भेरी

सेतू नच हा क्रतू श्रमांचा

विशाल हेतु श्रीरामांचा

महिमा त्यांच्या शुभनामाचा

थबकुनि बघती संघकार्य हें स्तब्ध दिशा चारी

बुभुःकारुनी पिटवा डंका

विजयी राघव, हरली लंका

मुक्त मैथिली, कशास शंका

सेतुरूप हा झोतच शिरला दुबळ्या अंधारी

 



 


No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...