Saturday, June 8, 2019

तुकाराम महाराज गाथा अभंग -- समचरणदृष्टि विटेवरी साजिरी ।



तुकाराम महाराज गाथा अभंग --  समचरणदृष्टि विटेवरी साजिरी ।


समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथे माझी हरी वृत्ति राहो ।। १ ।।
आणीक नलगे मायिक पदार्थ । तेथे माझें आर्त नको देवा ।। २ ।।
ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी । तेथे चित्त झणी जडो देसी ।। ३ ।।
तुका म्हणे त्यांचे कळलें आम्हा वर्म । जे जे कर्मधर्म नाशिवंत ।। ४ ।।

          तुकाराम महाराजांनी पांडुरंगालाच आपले दैवत मानले. पांडुरंगाची मनापासून भक्ती करू लागले. त्यांनी पांडुरंगाला आपल्या हृदयात साठवले. म्हणूनच त्यांना असे वाटते कि ज्याचे विटेवर उभे राहिल्यावर चरण व दृष्टी सरळ व सुशोभित आहे त्याठिकाणीच म्हणजेच पांडुरंगाच्या जागी माझी वृत्ती (मन) राहो. ह्याहून जे निराळे मायिक पदार्थ आहेत, मायिक पदार्थ म्हणजे माया, मोह उत्पन्न करणारे पदार्थ जसे कि सोने, चांदी, धन-दौलत, जमीन-जुमला इ. ह्या ठिकाणी माझी इच्छा किंवा मन जाऊ नये. जी काही ब्रह्मादिक पदे म्हणजेच उच्चं पदे आहेत ह्या ठिकाणी जर माझे मन गेले किंवा जडले तर माझ्यात एक अहंकार तयार होईल. यामुळे तुझ्यावरील व तुझ्या भक्तीवरील माझे मन उडेल. 
            तुकाराम महाराजांना असे सूचित करायचे आहे कि माणसे विनाकारण आपल्या क्षणिक सुखासाठी मायिक पदार्थांच्या मागे लागले आहेत पण हे पदार्थ नाशवंत व दुःख देणारे आहेत. पण खरे सुख तर पांडुरंगाच्या चरणी व त्याच्या डोळ्यात दिसत आहे व हे सुख नाशवंत नाही हे वर्म तुकाराम महाराजांना कळले आहे.










 


No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...