Saturday, June 1, 2019

सांघिक कामगिरी निर्णायक ठरेल

सांघिक कामगिरी निर्णायक ठरेल 

          दर चार वर्षांनी भरणाऱ्या क्रिकेटच्या 'कुंभमेळ्याला' आता सुरवात झालेली आहे. आतापर्यंत ११ विश्वचषक स्पर्धा झाल्या. पहिली स्पर्धा इंग्लंडमध्ये झाली व आताची स्पर्धा इंग्लंडमध्येच होत आहे. पहिली स्पर्धा झाली तेव्हा एकदिवशीय क्रिकेट नवखे होते. भारतीय क्रिकेटही एकदिवशीय सामान्यांना रुळले न्हवते. पण भारताने १९८३ चा विश्वचषक जिंकला आणि भारतीय क्रिकेटचे सारे चित्रच पालटले.भारतीय क्रिकेटकडे गांभीर्याने पाहिले जाऊ लागले. हळूहळू भारतीय क्रिकेट एकदिवशीय सामन्यात वर्चस्व गाजवू लागले. भारताने पाकिस्तानच्या सहकार्याने १९८७ ची स्पर्धा आपल्याच देशात भरवून यशस्वीही करून दाखवली. इंग्लंडच्या बाहेर स्पर्धा घेण्याचा मान भारताने मिळवला. आतापर्यंत या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने तब्बल ५ वेळा जिंकून बाजी मारली आहे. वेस्ट इंडिज व भारत यांनी प्रत्येकी २ वेळा तर श्रीलंका व पाकिस्तान यांनी प्रत्येकी एकदा हि विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे. 
          विश्वचषक स्पर्धा म्हणले कि सर्वाधिक चर्चा होते ती भारत पाकिस्तान सामन्याची. हा सामना म्हणजे क्रिकेटच्या मैदानावरील एक धर्मयुद्धच असते. दोन्ही संघातील खेळाडूंवर सामान्यापेक्षा प्रेक्षकांचेच दडपण असते. दोन्ही देशातील प्रेक्षकांना हार मान्य नसतेच. आपला संघ जिंकावा असे दोन्ही देशातील पाठिराख्यांची भावना असते. या भावनेतूनच दोन्ही देशातील खेळाडूंवर दडपण येते व खेळाडूही मैदानावर खेळ न खेळता एक धर्मयुद्धच खेळत असतात. आतापर्यंत भारताने विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानला एकदाही जिंकू दिले नाही. 
           या स्पर्धेत प्रत्येक संघ एकमेकांशी खेळणार असल्याने भारताने सर्व सामान्यांकडे गांभीर्याने पाहून प्रत्येक सामना कसा जिंकता येईल याकडे लक्ष केंद्रित करावे. यासाठी विराट कोहलीने विश्वविजेतेपदाचा अनुभव असलेला महेंद्रसिंग धोनीला हाताशी धरून व प्रत्येक खेळाडूवर विश्वास टाकून मैदानावर रणनीती आखावी. भारताकडे गुणवान खेळाडू आहेत फक्त गरज आहे ती सांघिक कामगिरीची. हि सांघिक कामगिरीच भारताला विश्वचषक स्पर्धा जिंकून देईल.
          



















No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...