Friday, March 15, 2019

अवीट गोडीचे गाणे -- अजीब दास्ताँ है ये, कहाँ शुरू कहाँ खतम




अवीट गोडीचे गाणे -- अजीब दास्ताँ है ये, कहाँ शुरू कहाँ खतम

          हे गाणे 'दिल अपना और प्रीत पराई' या चित्रपटातील आहे. हा चित्रपट १९६० साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन किशोर साहू यांनी केले. या चित्रपटात राज कुमार, मीना कुमारी, नादिरा यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाला संगीत शंकर जयकिशन यांनी दिले आहे तर गीते लता मंगेशकर, आशा भोसले, मोहम्मद रफी यांनी गायलेली आहेत. शैलेंद्र व हसरत जयपुरी यांनी गाणी लिहिली आहेत. 
         या चित्रपटातील सर्वच गाणी सुरेल आहेत. त्यातीलच 'अजीब दास्तां है ये' हे गाणे लतादीदींच्या सुरेल आवाजामुळे सुपरहिट झाले. हे गाणे शैलेंद्र यांनी लिहिले असून शंकर जयकिशन यांनी संगीत दिले आहे. या गाण्यातून शैलेंद्र यांनी नायिकेची व्यथा मांडली आहे. ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करतो व त्याची आयुष्यभर साथ मिळावी याची स्वप्न बघतो पण प्रेम करणारी व्यक्तीच दुसऱ्या कोणाची तरी होते व आपल्यापासून दूर जाते हि व्यथा या गाण्यात नायिकेची दाखवली आहे. हे गाणे राज कुमार, मीना कुमारी व नादिरा यांच्यावर चित्रित झाले आहे. 

अजीब दास्ताँ है ये, कहाँ शुरू कहा खतम

ये मंजिले हैं कौनसी, वो समझ सके हम

ये रोशनी के साथ क्यूँ, धूंआ उठा चिराग से
ये ख्वाब देखती हू मैं के, जग पडी हू ख्वाब से

मुबारके तुम्हे के तुम, किसी के नूर हो गए
किसी के इतने पास हो के, सब से दूर हो गए

किसी का प्यार लेके तुम, नया जहां बसाओगे
ये शाम जब भी आयेगी, तुम हमको याद आओगे










No comments:

Post a Comment

तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥

   तुकाराम महाराज गाथा - अभंग - घेई घेई माझे वाचे ।  गोड नाम विठोबाचे ॥ घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ तुम्ही घ्या र डोळे सुख । पाह...